ad

२१ ऑक्टोबर, २०२१

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

जे जे घडते ते सारे अनपेक्षितच असते
अपेक्षा न ठेवणे कधी, हे ही बरेच असते

तुला बोलावण्याचा,अट्टहास नको आता
ज्यास यायचे तो येतो हे ही खरेच असते

का सुर्या तुझ्याभोवती,फिरते उगा पृथ्वी
विनाकारण असे फिरणे,तिचे हसेच असते

केलेस कितीही तरी,शेवटी कमी भासणार
जगाच्या गरजेपुढे तुझे,कर्म उणेच असते

तुझ्या असण्याला , किंमत आजवर नाही
तुझ्या नसण्यानेही येथे, घडले असेच असते
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

असह्य होणाऱ्या स्पर्शांचे काय करू?
खिळून असणाऱ्या डोळ्यांचे काय करू?

बालपणाला प्रौढ बनवले आहे मी,
मनात असलेल्या होड्यांचे काय करू ?

दु:ख शहाण्या दुनियेचे समजू शकतो
सुखात असणाऱ्या वेड्यांचे काय करू ?

माझ्या ओठांनाच बिलगले ओठ तुझे
इतक्या हृदयाच्या ठोक्यांचे काय करू ?

प्रसन्न हा चेहरा पुन्हा दाखवला मी,
तुला न दिसलेल्या आठ्यांचे काय करू ?
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

११ ऑक्टोबर, २०२१

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

*बायको वाल्याकोळयाची*

बायको कशी असावी ?
बायको असावी तर, वाल्या कोळयाच्या बायकोसारखी.....

रामायण न वाचलेला किंवा टीव्हीवर रामायण न पाहिलेला, निदान रामायण या ग्रंथाचे नाव माहिती नसलेला माणूस, या भारतात तरी अपवादानेच असावा. रामायण, म्हटले की, आम्हां भारतीयांचा ऊर केवढा भरुन येतो.
रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात, पावलोपावली त्याचे दाखले दिले जातात...!

'पुत्र असावा तर, प्रभुरामासारखा'!
'पती असावा तर, मर्यादापुरूषोत्तम श्रीरामासारखा !',
भाऊ असावा तर, लक्ष्मणासारखा !',
'पत्नी असावी तर, सीतेसारखी !'
'भक्ति व शक्ति असावी तर, ती हनुमंतासारखी'

*सहजच माझ्या मनात एका प्रश्नाने घर केले, बायको कशी असावी?*

मी तो प्रश्न आजपर्यंत बऱ्याच जणांना विचारला, खूप साऱ्या जणांनी त्याचे उत्तर त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांचे दिले. अगदी रामायण महाभारतात असलेल्या आदर्श स्त्रिया ते अगदी आताच्या आघाडीवर असलेल्या अभिनेत्रीचे! खरं तर या सर्व दाखल्यापूर्वी आणखी एक दाखला आवर्जून द्यायला हवा.
तो म्हणजे,

*'बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी !'*

*कारण तीच खरी रामायणकर्त्याची 'कर्ती ' आहे !* हे दुर्लक्षीत सत्य कायमच दुर्लक्षीतच राहिले आहे.

रामायणकर्त्या वाल्मिकी ऋषीच्या जडणघडणीसंबधी, अगदी जुजबी इतिहास सांगितला जातो.

वाल्याकोळी वाटसरूंना जंगलात
अडवून, प्रसंगी त्यांचे मुडदे पाडून, त्यांची लूट करुन चरितार्थ चालवायचा.
*एकदा नारदमुनींनाच वाल्याने अडवले. तेव्हा नारदमुनींनी त्याचे तिथल्या तिथे बौधिक घेतले!*

*'अरे मूर्खा हे पापकर्म कशासाठी करतोस ?' असे विचारल्यावर, 'माझ्या बायको-पोरांसाठी'!*
असं सांगितल्यावर, नारदमुनी त्याला म्हणतात!
*'जा तुझ्या बायकोला विचारुन ये, ते तुझ्या पापात सहभागी आहेत काय ?*
'तुम्ही इथेच थांबा, मी विचारुन येतो' असे म्हणत, वाल्या पळतच घरी येतो. दारावर धाडकन् लाथ मारुन घरात घुसतो. बायकोमुलं घाबरतात.
*वाल्या बायकोला धमकाऊन विचारतो. 'बोल तू माझ्या पापात सहभागी आहेस की, नाही?'*

आता असा विचार करा! *शेकडो माणसांचे मुडदे पाडलेला, खाद्यांवर लखलखती कुऱ्हाड घेतलेला, क्रुरकर्मा, दरोडेखोर नवरा असा संतापल्यावर, एक अशिक्षीत, अडाणी, परावलंबी स्री दुसरं काय उत्तर देणार?*

*पण नाही. त्या तडफदार आदिमाया शक्तीने, क्षणाचाही विचार न करता, *'नाही, मी तुमच्या पापात सहभागी नाही!'* असे सडेतोडपणे सांगितले.

नंतर

*तीच घटना वाल्या कोळ्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारी ठरली.*

गरीबबापड्या बायकोच्या अनपेक्षीत तडफदार उत्तराने वाल्या कोळ्याचे डोळे खाडकन् उघडतात.
तो नारदमुनीची क्षमायाचना करतो. नारदमुनी त्याला दिक्षा देतात. तो तप करतो आणि दरोडेखोर वाल्या कोळ्याचा *वाल्मिकीऋषी* होऊन *रामायण* हे महाकाव्य रचतो.

ही सरळसाधी गोष्ट आपण वाचून सहज सोडून देतो. पण, एक साधी शंका कुणाच्याही मनात का येत नाही! की,
*समजा, वाल्या कोळ्याच्या बायकोने, 'व्हयं..आम्ही आहोतच की, तुमच्यासंग !' असं सर्वसाधारण, सोईचं उत्तर दिलं असतं तर?*

*नारदाचं काही खरं नव्हतंच पण, वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन, त्याने रामायण तरी कसे काय रचले असते?*
अशी रास्त शंका घेता येऊ शकते !

*पापाचा पैसा कमावणाऱ्या पती -परमेश्वराला, उंबऱ्यातच अडवून ते पाप घरात घ्यायला, त्या पापात सहभागी व्हायला, आजच्या " "सुसंस्कृत भारतीय गृहिणी" नकार देतील तर, बोकाळलेला भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल..!*

फक्त त्यांनी *वाल्याच्या बायकोचा आदर्श मात्र अंगिकारला पाहिजे.*
असे घडल्यास भारत भ्रष्टाचारमुक्त होऊन जागतिक महासत्तेच्या दिशेने निश्चित वाटचाल करेल !
*पुन्हा एकदा आपल्या भारत 'भूमी' वर निश्चितच रामराज्य अवतरेल व अनेक वाल्या कोळ्याचे वाल्मिकी मुनींमध्ये रुपांतरीत झालेले पाहण्याचे भाग्य आपणांस लाभेल...यात शंकाच नाही...!!!*
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

१० ऑक्टोबर, २०२१

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुला पाहताना तुझा होत गेलो
अता काय माझे असे राहिले
तुझा मोह माझ्यामधे चेतला अन्
दिवे पंचप्राणातुनी तेवले

अशी मुग्ध लाही कधी सोसली ना
कधी पाहिला दाहही कोवळा
तिन्ही काळ देहात माझ्या अताशा
उमलतात सर्वांगस्पर्शी झळा

परी चंद्रमा येइतो स्वागताला
नभी पेटले चांदणे पाहिजे
तुझे दिव्य लावण्य ओवाळण्याला
मला कर्पुराचे जिणे पाहिजे ….
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

५ ऑक्टोबर, २०२१

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

विरहात तुझ्या तुला भेटण्या आतुर मी झाले.
तुझे स्वप्न देखता डोळे माझे पाणावले.
तुझे जवळ असणे सुखावते मला.
तुझ्या निस्वार्थी प्रेमाची ओढ वाटे मला
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

रिक्तता लागूनही हातास माझ्या
मी पुन्हा गोंजारतो जगण्यास माझ्या

खोल असण्याच्या नको मारूस थापा
सांगुनी थकलो उथळ पाण्यास माझ्या

थांबला मृत्यू कधीचा वाट पाहत
चाललो घेउन तिथे जन्मास माझ्या

फूल त्याचे होउनी जाईल सुंदर
एकदा कर स्पर्श तू काट्यास माझ्या

मी इथे नसल्यावरी समजेल नक्की
अर्थ होता का कधी असण्यास माझ्या
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

ओल्या सांजवेळी.....

ओल्या सांजवेळी
रंगली ही गप्पा न्यारी...
ब-याच दिवसांनी
मित्रांची ही दुनियादारी...

सजला होता पुर्णपणे
चहाचा हा कट्टा...
मैत्रीच्या अाठवणींचा
करीत एकमेकांची थट्टा...

भरधाव वेगाने गाड्या
दुकाने बंद होत होती...
माणसेही अापल्या घरी
अन पाखरेही परतत होती...

जणु त्याच कट्टावर
चंद्रही येत होता...
अंधारही सगळीकडे
जरासा काळोख पसरत होता....

चांदण्याची इच्छा
ते ही मध्येच पटकले...
भोवताली त्या अाकाशात
लखलखत ते मिटमिटले...
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

१ ऑक्टोबर, २०२१

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी
माझी कविता मात्र एक निमित्तं असते
तुला मनभरून बघण्याची रोजचीच
डोळ्याची झटपट असते

हसणं जरी साधं तुझं
मला मोहक करून जात
कवितेच्या वहीत कविता म्हणून
तुझेच चित्र रंगवत जातो

माझ्या कवितेचं सुरुवातीचं अक्षर तू
माझ्या कवितेचं शेवटचं अक्षर पण तू
माझ्या कवितेचा पूर्ण सार तू
माझ्या कवितेमधला भाव पण तू

तु सोबत असताना आयुष्य कीती सुंदर वाटत.....
तुझ्या अबोल डोळ्यांमध्ये हरवून जावस वाटत.....
तू जवळ नसलीस कि कविता चुकते
तुझी आठवण आली कि मनाची तळमळ सुरु होते...
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...