ad

दुःख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दुःख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

३० एप्रिल, २०१५

Ab Bhi Taaza Hai Zakhm Seene Mein,

Ab Bhi Taaza Hai Zakhm Seene Mein, 

Bin Tere Kya Rakha Hai Jeene Mein, 

Hum To Zinda Hain Tera Sath Paane Ko, 

Warna Dair Kitni Lagti Hai Zaher Peene Mein


मला तु समजुन का घेतले नाही.....


तुटलेल्या ह्रदयाला,जोडता आले नाही,

मोडलेल्या मनाला,सावरताच आले नाही.....
तु सोडून गेल्यावर,माझे असे काहीच उरले,
सर्वकाही असुनही जवळ माझ्या,प्रेमाशिवाय काहीच तु घेतले नाही.....
तुझ्याशिवाय जगताना मला,जरा देखील करमले नाही,
की एक क्षण तुझ्याविणा,कधीच राहवले नाही.....
कधी तुझा ईतका आधीन झालो,मला माझेच कळले नाही,
स्वतःलाच तुझ्यात विसरलो मी,अस्थित्वच माझे उरले नाही.....
मी सुखच सुख दिले तुला,दुःखाशिवाय तु काहीच मला दिले नाही,
कोणता दिवस असा नाही गेला,ज्या दिवशी मी तुला आठवले नाही.....
जन्मोजन्मीच्या नात्याला तोडलेस तु,असे करताना तुला काहीच वाटले नाही,
ठेवलीस सारी स्वप्ने अधुरीच,जी स्वप्ने कधीच पुर्ण झाली नाही.....
का असा खेळ मांडलास प्रेमाचा,का विरहाचे घाव दिलेस मला,
प्रेम करत होतीस ना माझ्यावर,मग मला तु समजुन का घेतले नाही.....
मला तु समजुन का घेतले नाही.....

२५ डिसेंबर, २०१४

दूर निघून जाण्यापूर्वी



दूर निघून जाण्यापूर्वी
एवढं तरी कर
अंगणात माझ्या घेऊन ये
एखादी तरी सर...
तुझ्या सरीनं पुन्हा एकदा
भरून जाऊदे अंगण
तुझ्या पुरानं पुन्हा एकदा
वाहुन जाऊदे कुंपण
पसरून माझे हात पुन्हा
झेलीन तुझ्या गारा
श्वासामध्ये भरून घेईन
सळाळणारा वारा
ओसरून जाता सर तुझी
दूर निघून जाशील
ओल्याचिंब तुझ्या आठवणी
मागे ठेऊन जाशील
जेंव्हा जेंव्हा आठवेल तुझी
दुरावलेली सर
आठवणींचा पाऊस येईल
भिजवून जाईल घर

२४ डिसेंबर, २०१४

आठवतं तुला त्या भेटीत


आठवतं तुला त्या भेटीत
रिमझिम सरींनी छेडलं होतं .
भर दुपारी मला जणू
चांदण्याने वेढलं होतं .

आठवतं तुला त्या भेटीत
श्रावण धुंद बहरला होता .
ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने
ओला देह शहारला होता .

आठवतं तुला त्या भेटीत
दोघे व्याकुळ झालो होतो .
तुझा गंध वेचता वेचता
मीही बकुळ झालो होतो .

आठवतं तुला त्या भेटीत
भावनांनी कविता रचली होती .
माझ्या डोळ्यात तू अन
तुझ्या डोळ्यात मी वाचली होती.

आठवतं तुला त्या भेटीत
आणखी काय घडलं होतं ?
मला स्मरत नाही पुढचं
बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं

मला काय वाटलं;



मला काय वाटलं;
तर तुला काय वाटलं.
चुकीचं मी तुला ठरवलं तर ;
तू मलाच चुकीचं ठरवल.

खोटे आळ येडू आतातरी;
माझ्यावर लावू नकोस;
वेदना होतात या मला;
तू असं दुखवू नकोस.

माझ्या डोळ्यांच्या आरशात;
जर शोभत नाहीत अश्रू;
तर छेडु नकोस मला;
असं रडवूही नकोस.

असशील तू कोणा दुसर्याची;
कदाचीत माझी नसशीलही;
जरी हे खरं असेल तरी;
तू मला ते सांगू नकोस.

आता तरी किंमत लाव;
माझ्या तुज्यासाठीच्या स्वप्नांची;
नाहीतर कोणत स्वप्न;
मला दाखवूतरी नकोस.

आता तर आलीस अन् भेटलिस 
अन् ऐवढ्यातच निघालिस 
फक्त एक करार पाळण्यासाठी;
नाईलाजाने मला भेटू नकोस.

देवा


देवा,
तुझ्यासारखं मलाही तू
दगडाचं बनवलं असतंस तर,
किती बरं झालं असतं!
कुणी पुजलं नसतं तरी चाललं असतं,
निदान असं मला कुणी
लाथाडून तरी गेलं नसतं...

२३ डिसेंबर, २०१४

डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले..

डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले..
आजही पुन्हा तेच झाले
मनाला माझ्या फक्त तुझे
वेड लागले...
येताच आठवण तुझी
मनाला माझ्या खुप सावरले...
तरिही पुन्हा तेच झाले
सर्व जुने पुन्हा नवे झाले..
कुणी नाही तु माझा मनाला
माझ्य खुप समजावले तरिही
पुन्हा तेच झाले मन तुझ्याविना
उदास झाले..
जगायचे आयुश्य सुखात
अनेकांनी सांगुन पाहिले
तरिहि पुन्हा तेच झाले
तुझ्याविना हे आयुष्य
नकोसे झाले...

२२ डिसेंबर, २०१४

पाहतोय मी


किना-यावर उभ राहून
पाहिल तिला ......
आपल पाउल मागे घेताना
अस कितीदा पाहतो मी
आवडत मला ........
पाउल मागे घेतांना
खट्याळपणे तिने
पायाला केलेल्या गुदगुल्या
आठवतात मला ........
जीव जडलाय माझा
तिच्याच त्या
जीव लावण्यावर ........
माझ्या येण्याच्या चाहुलीने
तिने घेतलेली माघार
मला व्यापण्यासाठी
नाही, कदाचित ........
मला खुणावतेय ती
त्यावर आरूढ़ व्हायला
पण आता ........
पण आता
ओहोटी लागलीय
तिला आणि मलाही
अजुनही तसाच उभा आहे मी
किना-याला .......
वाळूत पाय घट्ट रोवून
तिला दूर जाताना
पाहतोय मी ........
हातून काहीतरी निसटताना
पाहतोय मी ........
पाहतोय मी ........

आठवतात मला ते सारे दिवस


आठवतात मला ते सारे दिवस
पाहत बसायचो मी तुला रात्रंदिवस
आजही आहेस तू माझीच
पण ते फक्त आठवणीतच
राहिलो नाही आता तुझा मी
हरवून बसलो भान माझा मी ....

दुसर्या सोबत पाहून थांबले माझे हृदयाचे ठोकेच
पण तुला कदर न त्याची
कारण ह्यावर बोललो न मी कधीच
आज पर्यंत कळले नाही तुला
प्रेम माझे काय होते
कारण तुझ्याच मनात पाप होते
वाटले होते प्रेम मी तुला करत राहील सदा
पण पाहिलेच नव्हते ह्या प्रेमात पडेल
माझ्यावरच गदा
माहित नव्हते तू एवढे मला छलशील
असशील माझ्या मिठीत अन हाथ दुसऱ्याला देशील
स्वप्न पहिले मी तुझ्या संगे राहण्याचे
पण घात तू केलास
बंद माझे डोळ्यांवर वार तू केलास

आठवतात मला ते सारे दिवस
तू बोलायची मी आहे तुझीच
आणि उद्याही राहील
मी हि तुला दिले वचन
तुला कळी सारखे ठेवेल

पण सांग मला काय माझा गुन्हा
खरेच आता सांगेल मी प्रेम न करणार पुन्हा

तुला काय वाटल,


तुला काय वाटल,

मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही,
तू जशी रागावून गेलीस,
तसा काय मी रागावू शकत नाही!!



तुझ्या आठवणीत डोळे माझे
नेहमीच रडतात,
पण मी कधीच रडत नाही,
तुझ्या आठवणीत मन
नुसत घुसमटत असत,
पण मी कधीच नाही,
तू सुखी आहेस,
तसा मीही जिवन्त आहे,कारण..
मी तुझ्याशिवाय जगू शकतो,
हे विष मी आता सहज पिऊ शकतो!!



तू नेहमीच बरोबर होतीस,
माझच नेहमी चुकल,
इतक्या वर्षान्च प्रेम आपल,
एका भाण्ड्णात आटल,
दु:खी असलो तरी आशेवर जीवन आहे,कारण..
देव माझ्याशी नेहमीच चान्गला वागतो,
आणि आपण परत एकत्र येऊ शकतो!!



लिहिण्यासारखे एवढेच होते,
बाकीचे तू समजून घ्यायचे,
इतके जुने नाते आपले,
तोडून नाही तुटायचे,
माझ्या भावना तुझ्यापर्यन्त पोहोचल्याच असतील एव्हाना,कारण..
मीही तुझ्यावर अगदी जिवापाड प्रेम करतो,
जशी तू मला,तसा मीही तुला खूप मिस करतो!!...

तू जेव्हा म्हणतेस



तू जेव्हा म्हणतेस , 
“तू नेहमीच असा वागतोस
 मुद्दाममला छळतोस ”,
तेव्हा तू मला आवडतेस..


तू जेव्हा म्हणतेस, 
“मला तुझ्याशी बोलायचे नाही आता ..”
आणि लगेच विचारतेस ,
“बोलतोस का आता ?”,
तेव्हा तू मला आवडतेस..



तू जेव्हा म्हणतेस, 
“ परत जर असावागलास तर..
मी तुला कायमची सोडून जाईन... 
लक्षात ठेव ” ,
तेव्हा तू मला आवडतेस..



तू जेव्हा म्हणतेस ,
”मी जगू शकत नाही तुझ्याशिवाय ..
आणि मला माहितीये की तुही माझ्याशिवाय..
”आणि पटकन मला मिठी मारतेस,
तेव्हा तू मला आवडतेस.

२१ डिसेंबर, २०१४

तुझ्याविणा एक क्षणही करमत नाही.


तुला एकटक पाहीलं की,
मला काय होतं,
काहीच कळत नाही.....

तुझ्याशी बोललो की,
मी का अबोल होतो,
काहीच वळत नाही.....

तुझ्या मिठीत आलो की,
मी का स्वतःला विसरतो,काहीच उमजत नाही.....

तुझ्यात गुंतलो का,
मी का बेभान होतो,
काहीच समजत नाही.....

तुझ्याडोळ्यात बघितलं की,
मी का तुझ्यात हरवतो,काहीचउमजत नाही.....

तुझ्याजवळ असलो की,
फक्त तुलाच पहावसं वाटतं,काहीच दुसरं दिसत नाही.....

तु लाजलीस की,
फक्त तुझ्या ओठांच हसू बनतो,काहीच जमत नाही.....

मनापासून खरं सांगायच तर,पिल्लू,
जानू, 
शोनू,
मला ना,
तुझ्याविणा एक क्षणही करमत नाही.

अन् आज खरंच ना तुझी कमी जाणवली'



अन् आज खरंच ना तुझी कमी जाणवली'

जीवनात टाकलेल्या प्रत्येक पावलांवरी,नकळतपणे माझी पापणी सये पाणावली...

काळजातली एक आर्त जखम चिघळली,
अन् आज खरंच ना तुझी कमी जाणवली...

आजवर तुझ्या आठवणीची होती सावली,सुख दुःखाच्या प्रवासात माझिया मनावरी...

तुझ्या ही सावली कुणी अनामिक गं केली,अन् आज खरंच ना तुझी कमी जाणवली...

तु होतीस प्रतिक्षेतल्या क्षणाला सावरणारी,वेळोवेळी मला योग्य ते मार्गदर्शन करणारी...कुणीतरी माझ्या मनाचीच दिशा बदलवली,अन् आज खरंच ना तुझी कमी जाणवली...

कुणीतरी आज उडवली भावनेची खपली,अन् आसवे डोळ्यातून गं सये ओघळली...

परकेपणा अनुभवला भावनांच्या बाजारी,अन् आज खरंच ना तुझी कमी जाणवली...

आठवण माझीही येइल मी गेल्यावर...!

आठवण माझीही येइल मी गेल्यावर...!
खरे प्रेम केल्याचे हे फळ......
प्रत्येक प्रेमकरानार्याने जरुर वाचावे...

आठवण माझीही येइल मी गेल्यावर...!
रात्रि झोपेतून दचकून मी जागा होतो,
अणि या अंधारात तुला शोधायचा प्रयत्नमी करतो,

हताश होउन पुन्हा झोपायचा प्रयत्न 
मी करतो,
तेवढ्यात एक अश्रु डोळ्यातून गालावर ओघलतो,
सुरु होतो आठावनिचा तो खेळ,
नाही रहात पुन्हा झोपायचा ताल-मेळ,
असे का होते की आपण ज्या व्यक्तीवर प्रेमकरावे,
त्या व्यक्तीने क्षणात आपल्याला सोडून जावे,
आणि 
स्वप्नाच्या दुनियेत बांधलेले घर,
खाडकन फुटावे,
कुठे कमी पडत होतो,
प्रत्येक वेळी तुलाच तर समजुन घेत होतो,

तुझ्यावर येणार्या संकटाना,
परतीचा रस्ता मी दाखवत होतो,
तू केलेल्या प्रत्येक चुकावर,
माफ़ी मी मागत होतो,

तुझ्या चुकानी होणार्या त्रासाने ,
वेळोवेळी मीच रडत होतो,
तुझ्याकडून झालेली चुक तुला 
कधीच दिसली नाही,
माझ्या डोळ्यातून येणार्या अश्रुनाही 
किम्मत राहिली नाही,
कामाचा दबाव आहे असे म्हणून,
तू माला टाळत होतीस,
पण या कारणा खाली,
तूच माझ्या पासून दुरावत होतीस,
काम तेव्हा मीही करत होतो,
माझ्या कामाचा दबाव तुला दाखवत नव्हतो,
वाटत होते तुला माझ्या 
साथाची गरज आहे,
तुलाच मी समजुन घेणे हेच माझ्या नशिबात आहे,
तुझे काम हे कधी संपले नाही,
आपल्यातील वाढत गेलेले अंतर,
हे तर कधीच मिटले नाही,
दरोज झोपताना देवाकडे एकच गार्हने असते,
तू सदैव खुश रहावी हेच माझे मागणी असते,

आशा आहे तू पुन्हा माझ्याकडे परतावी,
पण तू येणार नाही हे वास्तव स्वीकारता येत नाही,
प्रेम माझे संपणार नाही मी मेल्यावर,
पण आठवण माझीही येइल मी गेल्यावर...
आठवण माझीही येइल मी गेल्यावर

विश्वास


              विश्वासावर होतो जीच्या मी 

                 झाली नाही माझी ती 
                 बुडत होती नौका मनाच्या जेव्हा 
                 समोरच होता किनारा तेव्हा 
                 विश्वासावर होतो जच्या मी 
                 झाली नाही माझी ती 

सोडून जातांना एकदा


सोडून जातांना एकदा 
तू मागे वळायचं होतं.....
तुझं माझं नातं 
थोडं जपायचं होतं.....

पाठ फिरवली मी, 
तु हाक मारायचं होतं....
लपवलेल्या अश्रुंना माझ्या 
थोडं न्याहाळायचं होतं.....

काय हरवलं आहे आपल्यात ?
एकदा विचारायचं होतं....
अबोला धरला मी, 
तु कारण ताडायचं होतं. ...

हसतांना मला बघुन ,
तु जरा गोंधळायचं होतं
एक हुंदका मी जपला,
तु ओळखायचं होतं....

स्वार्था पुरतीचं प्रेम माझं,
हे ही खरंच होतं....
पण स्वार्थातल्या या प्रेमात 
एक "प्रेम" तेवढंच मुद्याचं होतं....

मार्ग आपले वेगळे, हे तर
शेवटी होणारच होतं...
स्वीकारायचं कसं.... हेच फक्त
कळत नव्हतं...

काळीज मी आणि ठोका तु एवढच
मला म्हणायचं होतं....
तुझं माझं नशीब, त्याने असच
का लीहायचं होतं.... ?????

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...