ad

१४ जून, २०१४

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर



आत्मविश्वासाला तडा गेल्यावर ,
कोणताच मार्ग उरत नाही..

सगळीकडे अंधार मग,
प्रकाश कुठेच रहात नाही..

डोळ्यातील पाणी सुकून जाते,
ओल्या जखमा मात्र काही केल्या सुकतच नाही ..

दुखं तेवढी सगळी सोबत असतात,
सुख मात्र थांबतच नाही..

अश्यावेळी समजवायला आपल्याला सगळे जण,
समजून मात्र कोणीच घेत नाही ..

वाटते मग देव तरी समजून घेईल आपल्याला,
कारण भावना आपल्या काही वाईट नाही ..

मग विटून जाते मन आपले देवाकडे प्रार्थना करून करून,
पण मन आपले त्यालाही कधी कध्धीच कळत नाही...

विसरून जावे म्हणतो आता सगळे ,
पण आठवण आल्याशिवाय काही रहात नाही ..

कारण माझीच माणसे आहेत ती सगळी ,
मी त्यांचा आणि ती माणसे माझी ,
या शिवाय माझ्या मनाला दुसरं काहीच कळत नाही ...

मोजकेच ठरलेले असते ना आयुष्य हे आपले 
आणि त्यातही एकमेकांचे मन दुखावून काहीच उपयोग नाही ...

परिस्थिती मुळेच माणूस घडत किवा बिघडत असतो ,
त्यामुळेच निर्माण होत असते त्याची चांगली किंवा वाईट ओळख,
म्हणूनच आता असे वाटते कि जे काही घडत आहे त्यात कोणाचा काही दोष नाही ..

आपले दुखं आपणच सांभाळावे आता,
आणि दुसरयाचे दुखं हि घ्यावे वाटून आपण,
मिळाले सुख तर त्यातूनच मिळेल,
कारण दूसरा कोणता आता मार्गच नाही ..

संपून जाईल लवकरच सगळे काही,
ना सुख उरेल ना दुखं,

गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली.. [an incomplete dream]



गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली
डोळे होते माझे मिटलेले ...आणि रात्र तिने चोरून नेली 
मागुन तिच्या अठवणीनी जोप माझी हिसकावून नेली 
पुढे पहाटेची वाट पाहता पाहता....कविता ही मला स्पूरुण गेली 

अश्या रात्रिमागुन रात्रि गेल्या ...तिला काही माझी कीव आलि नाही ..
स्वप्नातली भेट आमची सत्यात काही उतरली नाही ..
ती काही आली नाही....पण तिच्या आठवणी मात्र आल्या ...
अस्थिर माझ्या मनाला जगणं शिकवून गेल्या 

पेनातली शाई संपली ...वहीच्या ओळी भारत गेल्या ...
कवितेच्या प्रत्येक कडव्यात आठवणी तिच्या भरून गेल्या ..
दिस सरले ..महीने सरले ....वर्षामागुन वर्ष गेली ...
माझी प्रत्येक रात्र ..त्याच स्वप्नात रंगून गेली ..

मला आठवत... तिला जिन्कताना पहाण्यासाथी मी नेहमीच तिच्याकडून हरत असे .
तिच्या चेहरयावरचा आनंद मनात साठवून घेत असे ...
पण हरता हरता ..तिलाच हरवून बसेल असं कधी वाटलं नव्हतं ..
आयुष्यावर असे काले ढग जमतील असं मनात सुद्धा आलं नव्हतं ...

आता जगायला मी शिकलो आहे ....नेहमीच जिंकत आहे ...
कारण ह्या वेळेस आठवणी तिच्या मी पणाला लावल्या आहेत ...
त्यांना गमावून बसलो तर मी जगुच शकणार नाही ...
ह्या ह्रदयाच्या ठोक्यांचा मी अर्थच लावू शकणार नाही ..

आता मन करतच नाही,


आता मन करतच नाही,
तुला पुन्हा पहायला,
तुझ्या मिठीत यायला,
तुझ्या कुशीत शिरुन रडायला....

आता मन करतच नाही,
तुझ्या आठवणीत झुरायला,
तुझी वाट बघायला,
तुझ्या प्रेमात अखंड बुडायला.....

आता मन करतच नाही,
तुला वेड होवून शोधायला,
तुझ्याशी मनसोक्त गप्पा मारायला,
तुला पुन्हा परत बोलवायला....

तुझ्या - माझ्या प्रेमाच्या चारोळ्या !


तु माझी न झाल्याने
तुझ्यावर मी चिडलो होतो,

म्हणुन आहेर न देताच
मी तुझ्या लग्नात जेवलो होतो!

प्रत्येकाच्या मनात कुठंतरी
एक बिल क्लिंटन असतो,
आपल्या हिलरी बरोबर संसार करताना
तो मोनिकेच्या शोधात असतो!

तुझ्याशिवाय माझ्या मनात
कोणा मुलीचा विचार असणार नाही
तुझ्याशिवाय तसे मला
फुकटचे कोणी पोसणार नाही!

माझे आणि माझ्या बायकोचे
भांडण नेहमीच नविन असते
आम्ही कितीही भांडलो तरी,
कुठलीही शिवी रिपिट नसते!

बायकोच्या माहेरी सहसा
मी कधी जात नाही
माकडाच्या हाती रेशिम
टोमणा मला आवडत नाही!

खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,
कधीही न बदलणारं,
लोकांनी कितीही शिव्या घातल्यातरी
आपल्याच विश्वात रमणारं!

ह्या जगात खरच प्रेम असते का...


ह्या जगात खरच प्रेम असते का...
कधी कोण कोणासाठी झुरत का?
मग का तुटतात अचानक नाती.
मग का होतात मने वेगवेगळी

प्रेमाच्या नात्याला तितके महत्व नसते का?
कधी इज्जतीची पर्वा न करता,
घर सोडून पळतात.
कधी इज्जतीची पर्वा करत,
प्रेमाचा बळी देतात.
प्रेम हेच सर्व शिकवते का?

कधी प्रेम नाही मिळालं तर स्वतः मरतात.
कधी आपल्या प्रेमावर acid फेकतात.
प्रेम इतके निष्टुर असते का?
असे खुप प्रश्न आहेत त्याची उत्तरे नाहीत.
ह्या प्रश्नांची उत्तरे कधी काही असतील का?
ह्या जगात खरच प्रेम असते का...

२ मे, २०१४

Toot Tum Khud Hi Jao Gey

  
   ♥ Main Ne Uss Se Kaha Ke, 
chhor Do Ya Torr Do Mujhe ♥ 

♥ Uss Ney Hans Ke, 
Galey Se Lagaya Mujhe Or Kaha ♥ 

♥ Chorr Rahi Hoon Aaj Tumhen, 
Toot Tum Khud Hi Jao Gey ♥ 
                   

Wafa

♥ Aaj Bohat Soch Kar, 
Khud Se Sawal Kiya Main Ne ? ♥ 

♥ Aisa Kiya Hai Mujh Mein? 
Jo Log Mujhse Wafa Nahin Kartey ? ♥ 



Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...