ad

१४ जून, २०१४

काही गोष्टी ज्या मुलीना हव्या असतात [What A Girl Want]

काही गोष्टी ज्या मुलीना हव्या असतात पण मुली त्याविषयी कधीच तुम्हाला बोलणार नाहीत!

१) तुम्ही तिला नकळत मिठीत घ्याव

२) तिच्या डोळ्यात – डोळे घालून तिला I LOVE YOU म्हणावे

३) “ आज तू खूपच सुंदर दिसतेस “ अस तुम्ही तिला म्हणाव

४) तिला वाटत कि कधी तरी संध्याकाळी मस्त कुठेतरी एकांतात फिरायला जावे

५) तुम्ही दोघेही जेव्हा एकांतात असाल , तिला नक्की वाटेल कि याने मला घट्ट मिठी मारावी आणि हळूच कपाळावर चुंबन घ्याव.

६) कोणी जर तिला चिडवत असेल तर नेहमी तुम्ही तिची बाजू घ्यावी

७) तिने जर नवीन ड्रेस घातला असेल तर तिला नक्की वाटत कि याने माझी तारीफ करावी

८) तिला नेहमीच अस जाणवून देत जा कि तुम्ही तिच्यावर किती प्रेम करतात

९) ती जर एकटी असेल किव्वा घाबरत असेल तुम्ही तिला दिलासा द्यावा

१०) नेहमी तिला हसवाव... नेहमी प्रेमाच्या गोष्टी कराव्या .

११) अचानक तिला गुलाबच फुल द्याव

१२) तिला कल्पनाही नसतांना अचानक तिला छोटस गिफ्ट द्याव

१३) आणि सगळ्यात महत्वाच ... तिला सर्वात जास्त हेच वाटत कि याने माझ्यावर जीवापाड प्रेम कराव आणि नाजूक परीसारख जपाव..


आयुष्य

आयुष्याचं ध्येय ठरवताना "६-५-४-३-२-१" या क्रमाने विचार करावा: 
६ आकडी पगार,
५ खोल्यांचा फ्लॅट,
४ चाकी गाडी,
३ दिवसांची मस्त सुट्टी,
२ झकास मैत्रिणी आणि
१ साधी-सरळमार्गी बायको!

का कळेना


का कळेना
मावळतीच्या कातरवेळी
मन हे का कातर होई???

का कळेना
आठवणीत तुझ्या
मन हे का हळवे होई???

का कळेना
विसरण्याच्या बहाण्याने
तुझी सय का गडद होई???

का कळेना
तोडले तू पाश प्रेमाचे तरी
तुझ्या सईने मनास का वेदना होई???

खरच मी प्रेम केलय खरच मी प्रेम केलय



खरच मी प्रेम केलय खरच मी प्रेम केलय 
तुझ्या बोलण्यावर चालण्यावर 
तुझ्या हसण्यावर गाण्यावर
तुझ्या लाजण्यावर मुरकन्यावर
खरच मी प्रेम केलय
तुझ्या इवल्याशा मनावर………..तू पण जानलस लगेच
लाजून चूर झालिस तेव्हा
नंतर स्वताच्या अपेक्षा
भराभर मला सांगितल्यास जेव्हापण तू जेव्हा जवळ येऊन
तुझ ते जीवन नव्हत ते ऐकले
नाराज झालिस तेव्हा खूप
माझ मन तुला जेव्हा भावलेअशीच असते ग जीवनाची रीत
आपल्याला जे मिळत नाही
त्यपाठिच धावतो आपण
आपल्याला रस्ताच काळत नाहीस्वप्न इच्छा आकांक्षा
सगळे भौतिक असते ग
मनात असणार्‍या भावनांची
कदर राखली जात नाही गतू जागून काढलेल्या रात्रिन्वर
मी प्रेम केलय खूप मनापासून
आरशात पाहतो तुला मी
नेहमीच तू माझ्या जरी समोर नसून.मला माहीत आहे
तुझ प्रेम कायम राहणार आहे
जरी तू झाली नाहीस माझी
आपले प्रेम आठवणींवर जगणार आहेखरच मी प्रेम केलय 
तुझ्या बोलण्यावर चालण्यावर 
तुझ्या हसण्यावर गाण्यावर
तुझ्या लाजण्यावर मुरकन्यावर
खरच मी प्रेम केलय
तुझ्या इवल्याशा मनावर………..

सांग मला... [My Dream - love poem]


येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

वेड हसण्याची वेड दिसण्याची वेड रुसण्याची ग
वेड्या चंद्राची वेड्या ता-यांची रात्र वेडाची ग
वेड्या प्रश्नाच वेड उत्तर देशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

माझ्या नेत्रात माझ्या गात्रात मनात माझिया
तुझ्या गंधाचा तुझ्या छंदाचा उधाणे पुरिया
तुझ्या भरतिचा चंद्र नवतिचा करशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??



बघ जरा एकदा , ऐक माझ्या फुला
मौन माझे आता सांग बघते तुला
तुच स्वप्नातली चंद्रिका साजिरी
तुच सत्यातली मोहिनी लाजरी
अभ्र विरताना रात्र ढळताना येशिल का जरा??
कोणी नसताना काही कळताना येशिल का जरा??
तुझ्या नावात माझ्या नावाला घेशिल का जरा??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

तुझ्या आठवणी म्हणजे...


तुझ्या आठवणी म्हणजे... मोरपिसाचा हळूवार स्पर्श
 तुझ्या आठवणी म्हणजे... नकळत निर्माण होणारा हर्ष
 तुझ्या आठवणी म्हणजे... स्वप्नांनी सजवलेलं एक गाव
 तुझ्या आठवणी म्हणजे... विरह सागरात हरवलेली नाव
 तुझ्या आठवणी म्हणजे... आयुष्य जगण्याची आशा

 आणि

 तुझ्या आठवणी म्हणजे... गमवलेल्या गोष्टींची निराशा
 तुझ्या आठवणी म्हणजे... पावसात चिंब भिजणं
 तुझ्या आठवणी म्हणजे... ओसाड वाळवंटात एकटच भटकणं
 तुझ्या आठवणींशिवाय आयुष्यच अर्थहीन आहे
 तुझ्या आठवणींचा सहवास हाच माझ्या आयुष्याच रंग आहे.....!!

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर



आत्मविश्वासाला तडा गेल्यावर ,
कोणताच मार्ग उरत नाही..

सगळीकडे अंधार मग,
प्रकाश कुठेच रहात नाही..

डोळ्यातील पाणी सुकून जाते,
ओल्या जखमा मात्र काही केल्या सुकतच नाही ..

दुखं तेवढी सगळी सोबत असतात,
सुख मात्र थांबतच नाही..

अश्यावेळी समजवायला आपल्याला सगळे जण,
समजून मात्र कोणीच घेत नाही ..

वाटते मग देव तरी समजून घेईल आपल्याला,
कारण भावना आपल्या काही वाईट नाही ..

मग विटून जाते मन आपले देवाकडे प्रार्थना करून करून,
पण मन आपले त्यालाही कधी कध्धीच कळत नाही...

विसरून जावे म्हणतो आता सगळे ,
पण आठवण आल्याशिवाय काही रहात नाही ..

कारण माझीच माणसे आहेत ती सगळी ,
मी त्यांचा आणि ती माणसे माझी ,
या शिवाय माझ्या मनाला दुसरं काहीच कळत नाही ...

मोजकेच ठरलेले असते ना आयुष्य हे आपले 
आणि त्यातही एकमेकांचे मन दुखावून काहीच उपयोग नाही ...

परिस्थिती मुळेच माणूस घडत किवा बिघडत असतो ,
त्यामुळेच निर्माण होत असते त्याची चांगली किंवा वाईट ओळख,
म्हणूनच आता असे वाटते कि जे काही घडत आहे त्यात कोणाचा काही दोष नाही ..

आपले दुखं आपणच सांभाळावे आता,
आणि दुसरयाचे दुखं हि घ्यावे वाटून आपण,
मिळाले सुख तर त्यातूनच मिळेल,
कारण दूसरा कोणता आता मार्गच नाही ..

संपून जाईल लवकरच सगळे काही,
ना सुख उरेल ना दुखं,

गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली.. [an incomplete dream]



गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली
डोळे होते माझे मिटलेले ...आणि रात्र तिने चोरून नेली 
मागुन तिच्या अठवणीनी जोप माझी हिसकावून नेली 
पुढे पहाटेची वाट पाहता पाहता....कविता ही मला स्पूरुण गेली 

अश्या रात्रिमागुन रात्रि गेल्या ...तिला काही माझी कीव आलि नाही ..
स्वप्नातली भेट आमची सत्यात काही उतरली नाही ..
ती काही आली नाही....पण तिच्या आठवणी मात्र आल्या ...
अस्थिर माझ्या मनाला जगणं शिकवून गेल्या 

पेनातली शाई संपली ...वहीच्या ओळी भारत गेल्या ...
कवितेच्या प्रत्येक कडव्यात आठवणी तिच्या भरून गेल्या ..
दिस सरले ..महीने सरले ....वर्षामागुन वर्ष गेली ...
माझी प्रत्येक रात्र ..त्याच स्वप्नात रंगून गेली ..

मला आठवत... तिला जिन्कताना पहाण्यासाथी मी नेहमीच तिच्याकडून हरत असे .
तिच्या चेहरयावरचा आनंद मनात साठवून घेत असे ...
पण हरता हरता ..तिलाच हरवून बसेल असं कधी वाटलं नव्हतं ..
आयुष्यावर असे काले ढग जमतील असं मनात सुद्धा आलं नव्हतं ...

आता जगायला मी शिकलो आहे ....नेहमीच जिंकत आहे ...
कारण ह्या वेळेस आठवणी तिच्या मी पणाला लावल्या आहेत ...
त्यांना गमावून बसलो तर मी जगुच शकणार नाही ...
ह्या ह्रदयाच्या ठोक्यांचा मी अर्थच लावू शकणार नाही ..

आता मन करतच नाही,


आता मन करतच नाही,
तुला पुन्हा पहायला,
तुझ्या मिठीत यायला,
तुझ्या कुशीत शिरुन रडायला....

आता मन करतच नाही,
तुझ्या आठवणीत झुरायला,
तुझी वाट बघायला,
तुझ्या प्रेमात अखंड बुडायला.....

आता मन करतच नाही,
तुला वेड होवून शोधायला,
तुझ्याशी मनसोक्त गप्पा मारायला,
तुला पुन्हा परत बोलवायला....

तुझ्या - माझ्या प्रेमाच्या चारोळ्या !


तु माझी न झाल्याने
तुझ्यावर मी चिडलो होतो,

म्हणुन आहेर न देताच
मी तुझ्या लग्नात जेवलो होतो!

प्रत्येकाच्या मनात कुठंतरी
एक बिल क्लिंटन असतो,
आपल्या हिलरी बरोबर संसार करताना
तो मोनिकेच्या शोधात असतो!

तुझ्याशिवाय माझ्या मनात
कोणा मुलीचा विचार असणार नाही
तुझ्याशिवाय तसे मला
फुकटचे कोणी पोसणार नाही!

माझे आणि माझ्या बायकोचे
भांडण नेहमीच नविन असते
आम्ही कितीही भांडलो तरी,
कुठलीही शिवी रिपिट नसते!

बायकोच्या माहेरी सहसा
मी कधी जात नाही
माकडाच्या हाती रेशिम
टोमणा मला आवडत नाही!

खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,
कधीही न बदलणारं,
लोकांनी कितीही शिव्या घातल्यातरी
आपल्याच विश्वात रमणारं!

ह्या जगात खरच प्रेम असते का...


ह्या जगात खरच प्रेम असते का...
कधी कोण कोणासाठी झुरत का?
मग का तुटतात अचानक नाती.
मग का होतात मने वेगवेगळी

प्रेमाच्या नात्याला तितके महत्व नसते का?
कधी इज्जतीची पर्वा न करता,
घर सोडून पळतात.
कधी इज्जतीची पर्वा करत,
प्रेमाचा बळी देतात.
प्रेम हेच सर्व शिकवते का?

कधी प्रेम नाही मिळालं तर स्वतः मरतात.
कधी आपल्या प्रेमावर acid फेकतात.
प्रेम इतके निष्टुर असते का?
असे खुप प्रश्न आहेत त्याची उत्तरे नाहीत.
ह्या प्रश्नांची उत्तरे कधी काही असतील का?
ह्या जगात खरच प्रेम असते का...

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...