ad

२४ जून, २०१४

Umar



Umar Ki Raah Mein Raste Badal Jate Hai….

Waqt Ki Aandhi Mein Insaan Badal Jate Hai….

Sochte Hai, Tumhe Itna Yaad Na Kare….

Lekin, Aankh Band Karte Hi Iraade Badal Jate Hai….


Log Baarish Ko Bhool Jaate Hai….


Udaasi Bhi Muskaan Ban Jayegi….


Rukti Hui Saanse Bhi Jaan Ban Jayegi….


Bhej Dijiye Hawaon Mein Apna Paigam…..


Wahi Humari Khushi Ki Farmaan Ban Jayegi….






Awesome Believeable Shayari



Apne Aasma Se Meri Zameen Dekh Lo….

Tum Khwaab Aaj Koi Haseen Dekh Lo….

Azmaana Hai Agar Aitbar Ko Mere….

To Ek Jhut Tum Bolo Aur Mera Yaqeen Dekh Lo….


२३ जून, २०१४

प्रिये..



प्रिये..

तुझी ईच्छा असेलच तर मी

मरण्यास तयारआहे पण,

खरे विष दे..

शब्दांचे विष नको ग देवूस..

कारण ख-या विषाने

एकदाच मरेन पण..?

शब्दाच्या विषाने सारखा

मरेन..


२० जून, २०१४

तिच्या सुंदर डोळ्यात



तिच्या सुंदर डोळ्यात दिसतं काहीतरी मला

तिच्या नाजूक ओठांवर दिसतं काहीतरी मला

तिच्या त्या घायाळ नजरेत दिसतं काहीतरी मला

तिच्या निर्मळ मनात दिसतं कहीतरी मला

साधी आहे खूप ती म्हणून मनातल बोलायला जमत नाही 

जवळ आली की काय बोलावं हेच कळत नाही मला

वाटतं कधी कधी वाटतं मला की सांगावं तिला किती प्रेम करतो तिच्यावर मी

पण दूर होईल ती माझ्यापासून आणि गमवून बसेन तिला कायमचा एक मैत्रीण म्हणून

कदचित म्हणूनच सुप्त भावना मनातली दडवून ठेवतो मी


तू माझ्या आयुष्यात नसण,



तू माझ्या आयुष्यात नसण,

हे तर प्रत्येक क्षणाला मारण्यासारखं ..
पण तुझं नसण आता खोल कुठेतरी जाणवायला लागलय,,
म्हणूनच लवकर ये ..
माझ्या मनाचा बांध तटायच्या आधी ये..
अन उरात धडपडणारे श्वास थांबण्याआधी ये, जीवनाची शिवण उसवण्याआधी ये..
लवकर ये..
मी तुझी वाट पाहतेय,,
क्षितिजापल्याड काहीतरी शोधतेय ,
शोधताना पडून ,ठेचकाळून ..
रक्तबंबाळ होतानाही .. माझे श्वास तुझेच असतात
अन तुझे श्वास माझे..
निदान माझ्या स्वप्नांच्या अवकाशात ये ..
माझा आत्मा तुझ्याचभोवती रुंजी घालतोय ,
त्याच्यासाठी तरी ये ,.....
तू ये किंवा नको येऊ , पण माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत ..
मी तुझी अन फक्त तुझीच वाट पाहणार आहे..
कारण ..
या वेड्या मनाला ..
तुझी अन फक्त तुझीच ..
ओढ आहे..—



चुकलंच.... पण कुणाचं ??



चुकलंच.... पण कुणाचं ?? 

कधी कधी माझं मन मला खायला उठतं,

मी तिला असं दुःखवायला नको होतं...



हां, झालं असेल काही उलटं सुलटं,

कदाचित ते तिच्या मनात नसेल सुद्धा..!!

मी कधी याचा विचारच का केला नाही?

आत्ताच का डोकं खायला लागलाय हा मुद्दा..??



पण तरीही ती माझीच होती,

कमीतकमी त्या क्षणापर्यंत तरी..!!

झालं गेलं विसरून जां !! असं म्हणायला पाहिजे होतं,

पण कुणी?, मी नाही म्हटलं... तिनं तरी??



तिला काय वाटत असेल आत्ता?

जे घडलं त्या दिवशी, याचा ती विचार करत असेल का...?

शेवटी मान्य करुन चूक तिनं केली घोडचूक ...पण,

मी काय करू? काय नको ? ...असं मलाच कोड्यात टाकलं .. ते का?



मी काहीच बोललो नाही.

बोलायचं होतं, पण शब्दच फुटले नाही..

बस्स.. डोळ्यात डोळे घालून बघत राहिलो,

पण कदाचित म्हणूनच ती तिथं थांबली सुद्धा नाही..!!



शेवटचा निर्णय तिचाच होता ,

त्यावर तरी मी काहीतरी बोलायला हवं होतं,

दुःखवायचं होतं तिला, म्हणून चूप राहिलो, पण.. आत्ता वाटतं..

मी तिला असं दुःखवायला नको होतं...

मी तिला असं दुःखवायला नको होतं........!!!!



की...? तिनं तरी मला असं दुःखवायला नको होतं...


१६ जून, २०१४

विसरला जात नाही

भूतकाळ कितीही जूना असला तरी तो कधी विसरला जात नाही

डोळ्यासमोर तो येऊन उभा राहिल्यावर डोळ्यातले पाणी संपत नाही

पृथ्वी गोल आहे हे तेव्हा एकदा जरूर लक्षात येत.. जेव्हा भूतकाळातल प्रेम आपल्यासमोर येऊन उभ असत

सगळ्यात जास्त दुःख तर तेव्हा होत जेव्हा त्याच्या हातात हात घालून कोणी दुसर उभ असत




भातुकलीचा खेळ कधी खरा होतच नाही मनात रंगवलेली स्वप्न कधी खरी होतच नाहीत

राग कितीही असला तरी आज प्रेमही मनात येत कधीतरी चुकून वाटत की आपलच काहीतरी चुकल

हा भूतकाळ नेहमी नको तेव्हा समोर येतो मोठ्या मेहनतीने बनवलेलं मनातल 
हे काचेच घर क्षणात तोडून मोकळा होतो .......!!!

कुठं तरी थांबवायला हवं..

स्वप्न प्रत्यक्षात उतरायला बऱ्याच गोष्टींची गरज असते. त्या सर्व गोष्टी आपल्याला हव्या तशा आणि हव्या त्या वेळी हाताशी याव्या लागतात.त्या येतातही; पण बराच वेळा निसटूनही जातात आणि आपलं स्वप्न
रंगवायला काही रंग कमी पडतात की काय, याची जाणीव आपल्याला व्हायला लागते. मग आपल्याला वाटायला लागतं- ठरवलं तसं घडलं नाही आणि जे घडलं ते आपलं मन मनायला तयार होत नाही. आपण मनात साठवलेलं स्वप्न जसंच्या तसं आपल्याला हवं असतं.




थोडेसे रंग नसले म्हणून प्रत्यक्षात आपल्या समोर आकाराला आलेलं स्वप्नही मग आपल्याला भावत नाही. यात स्वप्नांचा दोष नसतो. दोष असतो तो आपल्या मनाचा.रंगांच्या रांगोळीपुढं रंग नसलेली साधी रांगोळीसुद्धा तिचं अस्तित्व दाखवत असते, हे आपण विसरतो.आपल्या आयुष्यात हे असंच व्हायला पाहिजे होतं, असं म्हणत, ते तसं का झालं नाही म्हणून स्वतःला आणि सभोवतालच्या माणसांना किंवा परिस्थितीला दोष देत आयुष्यभर कुढत राहतो. रडत राहतो.
उदास होतो. माणसाच्या आयुष्याचं एकूण मोल लक्षात घेऊन माणसानं आपलं असं वागणं
कुठं तरी थांबवायला हवं..

तु ये पुन्हा माझ्यासाठी ये..!!

न करमत आहे तुला न राहवत आहे मला हवेतला गारवा बनुन तु ये..!!
स्वप्नांत रोज यायची तु दबक्या पावलांनी तशीच पैंजण्यांचा आवाज करत ये..!!
थरथरतंय अंग माझे सावरायला तु ये.. जागतो मी रात्र रात्र निशा बनुन तु ये
प्रेम तु ही करतेस अन मी ही मनास माझ्या मुग्ध करावयास तु सुगंध बनुन ये..!!
डोळयांत पाणी तुझ्याही आणि भिजतो आहे मी ही अधुरया राहील्या कविता 
माझ्या हरवले आहे शब्दही लेखणी बनुन ये..!!
खुप आठवण तुझी येते शोना तु माझ्यासाठी परत ये
बघ माझी दैना काय जाहली डोळयांत आतुरता पाहण्याची तुला
मुका झालो आहे मी रडतो आहे एकटयात अश्रु पुसुन आधार दयावया तु ये..!! 
माझ्या सोबत रात्र रात्र बोलणारी शोना तु परत ये..!!

बंद डोळे अनुभवतात

क्षणभर डोळे बंद करून विचार करावा...तुम्हाला तुमचं उत्तरं मिळेल...
आयुष्यात आपल्याला नक्की कुठली व्यक्ती आवडते हे ठरवायचं असेल ना तर क्षणभर डोळे बंद करून विचार करावा...
तुम्हाला तुमचं उत्तरं मिळेल...कारण उघडे डोळे ना धोका देतात...
उघड्या डोळ्यांना फक्त वरवरच दिसतं...तर बंद डोळ्यांना आतलं दिसतं...






उघड्या डोळ्यांना फक्त चेहरे दिसतात.. बंद डोळ्यांना कोणाचा चेहरा दिसत नाही...
बंद डोळ्यांना फक्त खूप गरज असतांना साथ देणाऱ्या त्या हाथांचा स्पर्शच कळतो...
उघड्या डोळ्यांना फक्त भौतिक सौंदर्य आणि भौतिक सुखं दिसतं...
बंद डोळ्यांना भावनिक साथ दिसते... अन आयुष्याच्या प्रवासात ही साथ जास्त महत्वाची असते...
उघडे डोळे फक्त बघतात.. म्हणून ते नेहमी भ्रमात पडतात..
बंद डोळे 'अनुभवतात'... म्हणून ते नेहमी खरे ठरतात.

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...