ad

१ सप्टेंबर, २०१४

हसतेस एवढी छान की,

हसतेस एवढी छान की,
हसत रहायला शिकवलेस तू..
बोलतेस एवढी छान की,
बोलत रहायला शिकवलेस तू..
लाजतेस एवढी छान की,
मला आवडायला लागलीस तू..
जीव एवढा लावलास की,
प्रेम करायला लावलेस तू,
किती प्रेम करतेस तू..
एवढ प्रेम नको ना करूस,
मग काय झाल अचानक..
सोडून मला का गेलीस तू,
गेलीस तर गेलीस..
पण तुला विसरु कसा,
हे शिकवायला विसरलीस बघ तू..
ए,
ते शिकवायला तरी परत येशील ना गं तू..???

tai


८ ऑगस्ट, २०१४

जिवन



मोर नाचताना सुद्धा रडतो…
आणि..
राजहंस मरताना सुद्धा गातो….

दुःखाच्या रात्री झोप कुणालच लागत नाही…
आणि.. सुखाच्या आनंदात कुणीहीझोपत नाही

यालाच जिवन म्हणतात…..

एक हृदयस्पर्शी कथा.... तो अजुनहि झोपलाच होता,





एक हृदयस्पर्शी कथा.... तो अजुनहि झोपलाच होता,
वर टांगलेल सलाईन
वाऱ्या निशी हालत होत.
त्यातून टपकनारे थेँब
त्याच्या रक्तात भिनत
होते.झोप कसली येत होती त्याला...??
उघड्या डोळ्याने तो एकाच
ठिकानी बघत होता.
त्याची आई औषधे व गोळ्या घेवून
आली, त्याला थोडे फार
खाण्याची विनंती केली. पण
त्याने गप्प राहून नकार दिला,
आई गेल्यानंतर त्याने
एका हाताने औषधे व
गोळ्या घेतल्या........ . घड्याळाच्या टोलानीँ त्याचे
लक्ष वेधले. सहा वाजले होते,
त्याने चटकन चादर
बाजूला केली ' अरे बापरे ! क्लास
तर संपून गेला असेल ' अंगात
एवढेही बळ नसताना त्याने हातातली सुई खेचून
काढली. भळ-
भळनाऱ्या रक्तावर
कापसाचा बोळा पकडून
तो सायकल जवळ गेला.
त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हत. भर पावसात
तो सायकल घेवून क्लासकडे गेला.
क्लास तर केव्हाच संपून
गेला होता. बहूतेक सर्वजण
घरी निघून गेले होते
थोडी पावसाची भूर-भूर चालूच होती.... ती आजून
हि क्लासच्या बाहेरत्याची वाट
पाहत
उभीच
होती. त्याला बघितल्यावर
तिचे डोले चमकले. तिला त्याचा राग आला होता,
झपझप चालत
त्याच्याजवळ पोहचली.
त्याच्या डोक्यावर छञी पकडून
त्याचा कान धरला, "तू
आजारी असताना इथं का आलास ?
आणि पून्हा छञी विसरलास,
बापरे ! किती पाणी"
त्याच्या डोक्यावरून
पाणी झटकत ती म्हणाली,
"पूर्ण ओला झालाय आणि मग
सर्दी झाली म्हणजे मलाच
म्हणशिल......" अरे ! किती बडबड
करते मी ? जाऊ दे बरं, डाँक्टर
काय म्हाणालें तब्येत कशी आहे?
दोघेही क्लासच्या बाहेर पायरीवर जाऊन
बसले. तो अजूनही काकडत होता.
तिच्या डोळ्यामध्ये त्यांचे
बावरलेलं मन स्वत:ची खोलवर
रूजलेली प्रतिमा शोधत
होत. तिचे निरागस डोळे माञ
सदैव त्याच्याच चिँतेत बूडालेलेदिसत
होते.
त्याच्या अतिभोळेपनाची तिला काळजी वाटायची,
त्याच्या प्रेमाच्या वेडेपणाची सीमा अजून
तिलाही ठरवता आली नव्हती.
त्याच्या कपाळावर तिने हात ठेवला आणि ती दचकलीच,
" बाप रे ! किती भयंकर ताप
आलाय तूला ! अन, तरी तू
एवढ्या पावसात
मला भेटायला आला?
तूला काही झालं म्हणजे? नाही मीच
वेडी आहेँ. मीच थांबते ना !
आता मी थांबणारच नाही, तू
बघच मी, थांबतच नाही ! असं
द्रृष्ट लागण्याजोगे प्रेम
बघून त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी जमा झालं,बोलण्याचा प्रयत्न
करताच त्याला खोकला आला. तिने त्याला न
बोलण्याची विनंती केली.
त्याचा हात आपल्या हातात
घेताच, तिने हातावरुन
ओघळणारे लाल रक्त बघीतले.
ती यावेळी माञ चिडलीच, "तू हे काय केलंस? तू सलाईन
काढले ना? का स्वता:ला ञास
करून घेतोस?
तुला होणाऱ्या वेदना काळजात
सूई प्रमाणे घुसतात,जा !
मी बोलणारच नाही. अरे तुला काही झाले म्हणजे
मी आणि माझे जीवन........... ..."
त्याने तिच्या ओठांवर
हात ठेवला. पुढचे शब्द
काळजाला चिरणारे
होते.त्याच्या डोळ्यातून थेँब
ओघळला. तिच्या निस्सिम
प्रेमासाठी-
आणि तिच्यासाठी,तरीह ी त्याच्या डोळ्यातल्या अश्रुनी तिला अस्वस्थ
करुन टाकले.
तिच्याहि डोळ्यांतून
पाणी टपकत होते,"खरच,
इतक प्रेम करतोस का रे
माझ्यावर... मग का असा ञास
देतोय? तुझ्या या वेडेपणानेच
मला वेड
लावंल-तुझ-तुझ्य
ा प्रेमाचंमी सुध्दा इतकी वेडी आहे
ना- मी थांबते म्हणून तर तू येतोस.
दोघेपण अगदी वेडे आहोत.
तिने त्याच्या खांद्यावर मान
टेकवली. तिचे डोके थापटत, तो माञ
कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात
हरवून
गेला होता, तिथे फक्त
तिच्या बांगड्यांची किण-किण
आणि तिचा आवाज कानी येत होता. तेवढ्यात
त्याच्या सरांची थाप
त्याच्या पाठीवर पडली, "
काय रे ? केव्हाचा आवाज देतोय-
काय करतोय इथं एकटा ?
एवढ्या पावसात का बसलाय ? घरचे म्हणत होते तू आजारी आहेस
म्हणुन "
सरांच्या आवाजाने तो भानावर
आला.... त्याने मान
डोलवली. सर आत निघून गेले. भरलेल्या डोळ्यानी किँचित
मागे वळूनपाहिले.
क्लासमध्ये
टांगलेल्या तिच्या फोटोची माळ
वाऱ्यानिशी हालत होती.
ती क्लास मधली एक हूशार विद्यार्थीनी होती...!!! सर्व
काही द्रृष्ट
लागल्या प्रमाने घडून गेलं होत.
स्वप्नाहूनही सुंदर
अशा त्यांच्या दुनियेवर काळाने
अशी झडप घातली कि त्या दुनियेतील
सर्व सुख काळ
आपल्या बरोबर घेऊन
गेला होता. फुलांआडून
डोकवणाऱ्या तिच्या डोळ्यामध्ये
घोर चिँता दिसून येत होती.
कोण समजून घेणार
माझ्या या वेड्याला ? कोण
शिकवणार याला माझ्याशिवाय जगणं?
कोणी जपेल
का याला माझ्याप्रमाणे? असे
अनेक प्रश्न तिला पडले
असावे. त्याचे मन माञ
एखाद्या वेड्या हरणाप्रमाणे तिच्या सावलीमागेच पळत
होतं, ते हेमानायला तयारच
नव्हत की तिच अस्तित्व
आता संपलय म्हणून. असे सावल्यांचे खेळ-आभास
त्याच्या जिवनाचा एक भागच
बनून गेले होते. ह्रूदयात जपून
ठेवलेल्या तिच्या आठवणी अश्रु
बनुन क्षणा-
क्षणाला बाहेर पडत होत्या. तिची प्रतिमा डोळ्यामध्ये
भरून जड अंत:करनाने तो सायकल
जवळ गेला. काकडंत- काकडत
त्याने सायकल घेतली वघराकडे
चालू
लागला आणि चालता- चालता बेशुध्द होऊन पडला...... हे सर्व प्रेम होत कि वेड !
मी त्यावेळी हे सारे फार जवळून
बघितले होते.
का कुणीतरी इतकही प्रेम करू
शकत ? हे
असं कसं प्रेम होत जे म्रूत्युनंतर सुद्धा जिंवतहोत?
खरचं त्याच्या वेडे
पणाला म्रूत्युच्याही मर्यादा कमी पडल्या होत्या....
या अगोदर तो खुप
चांगला असायचा,
क्षणोक्षणी त्याच्या चेहऱ्यावर आनंद असायचा, पन
त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर
हास्य मी पहीलेच नाही. आता त्याने आपल्या मनावर
ताबा मिळवलाय.
सर्वाशी तो चांगला वागतो अगदी पूर्वीप्रमाणे.
पण फरकएवढाच आहे
की तो पूर्वी सर्वाशी बोलु
शकत होता. त्यावेळी आजारात त्याने
आपली वाचा गमावली होती.
त्या दोघांच्या सुखासमोर
स्वर्गसूद्धा फिका पडत
असावा म्हणुन
देवालाही हेवा वाटला आणि............ .... जे खरोखर चांगल घडत असतं तेथेच
नशिब तोकडे पडते
हा प्रश्न तर फार पूर्वीपासून
अनुत्तरीतच आहे. ...... असचं
नेहमी का घडतं? का ?

तू आणि मी..!!



पाऊस आणि जमीन यांच किती सुंदर प्रेम.

जमीन झेलायला आतुर पावसाचा प्रत्येक थेंब,

माझ्या जीवनात तू पावसासारखं बरसावं,

त्यासाठी मी रात्रंदिवस तरसावं,

तू बरसण्यासाठी आणि मी तरसण्यासाठी,

एकच गोष्ट आवश्यक आहे,

ती म्हणजे, तू आणि मी..!!

७ ऑगस्ट, २०१४

आपुलकी


मागचे सगळे वीसरुन आता शीकावे
स्वताहाचे आयुश्य जगायला... 
इथे कोणालाही नसतो वेळ 
कोणाबरोबर आपुलकीने वागायला... 


११ जुलै, २०१४

"तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?"




लग्नाला बारा वर्ष झाल्यावर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ...
"तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?"

तो बावचळला ... गोंधळला ... आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हती नं ... !
प्रेम नवं नवं होतं तेव्हा ठीक होतं हो ... तिच्याकडून दिवसातनं एकदा तरी हा प्रश्न यायचा आणि त्याच्याकडे ही एकदम भारी भारी उत्तरं तयार असायची ...

पण मग लग्न झालं ...
संसार नावाची प्रश्नपत्रिका सोडवता सोडवता ही असली तोंडी परीक्षा पार विस्मरणात गेली ...
आणि काल परवा अचानक हा गुगली पडला ...

त्यातून तिनं प्रश्न विचारला तेव्हा ती पोळ्या करत होती ..
हातात लाटणं ...
समोर तापलेला तवा ...
त्यानं संभाव्य धोका ओळखला ..
आणि 'सांगण्यासारखं प्रचंड आहे ..
संध्याकाळी सावकाशीनं सांगतो ...'
असं म्हणून तो कामावर सटकला ... !

तो घरातून बाहेर पडला खरा ...
पण घर काही डोक्यातून बाहेर पडलं नव्हतं .. !
अख्खा दिवस शब्दांची जुळवाजुळव करण्यात गेला ...
कठीण असतं हो ...
नात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दांतून सोडवणं कठीण असतं ..

तो विचार करत होता ..
काय सांगावं .. ?

मी राजा .. तू माझी राणी वगैरे काही म्हणावं का ...
नको .. फार फिल्मी वाटतं ..

तू खूप छान आहेस ...
असं म्हणावं ... नको ...
तिला ते फारच रुक्ष वाटण्याची शक्यता आहे ..
समजूतदार सहनशील वगैरे म्हणावं ...
तर ती नक्की म्हणेल ...
राजकारण्यांसारखी उत्तरं देऊ नकोस ...
त्याला काहीच सुचेना ...

बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं ... हे दोन्ही शिकवणारे क्लासेस असायला हवे ...
लाईन लागेल नवऱ्यांची ...
त्याच्या मनात असले भलभलते विचार येत होते ..

सूर्य मावळला ...
घरी जायची वेळ झाली ..
आपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या उजव्या डोळ्याची भुवई वर जाणार ...
याची त्याला खात्री होती ...

घरचा अभ्यास न करता शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता ...
त्यानं बेल वाजवली ..
अपेक्षेप्रमाणे तिनं दार उघडलंच नाही ..
त्याच्या मुलानं दार उघडलं ... आणि पुढच्याच क्षणी कांद्याच्या भजीचा घमघमाट नाकात शिरला ...

मुलगा जवळ जवळ उडी मारत म्हणाला ... "भजी केलीत आईनं ... पटकन हातपाय धुवून या ..."

तो मान डोलावून आत गेला ... आणि पुढच्याच क्षणी टेबलवर हजर झाला ...

बायकोनं भज्यांची प्लेट समोर मांडली ...
त्यानं विलक्षण अपराधी चेहऱ्यानं तिच्याकडे पाहिलं ...

तिनं तोंडभर हसून विचारलं .. "काही सुचलं ... ? "

त्यानं नकारार्थी मान हलवली ...

तशी ती पटकन टाळी वाजवून आनंदानं म्हणाली ... "मलाही नाही सुचलं ... ! "

तो पुन्हा गोंधळला ...
इतकी अनपेक्षित प्रतिक्रिया ... ?

आणि ती बोलतच होती ...
"काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीनं मला विचारलं ...
तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटतं ... ? "

सात दिवस विचार केला ..
पण मला काही सांगताच येईना ...
मग भीति वाटली ...
माझं तुझ्यावरचं प्रेम आटलं की काय .. ?
अपराधी वाटायला लागलं - काय करावं कळेना ...
मला स्वतःविषयी शंका होती पण बारा वर्षानंतर ही तुझं प्रेम कणभर ही आटलेलं नाही याची खात्री होती.
म्हणून मग हा प्रश्न तुला विचारला ...
वाटलं .. तुला उत्तर देता आलं तर आपण 'Fault' मध्ये आहोत ..
पण नाही ... तुलाही उत्तर देता आलं नाही ...
म्हणजे आपण आता अशा वळणावर आहोत ...
जिथे फक्त 'वाटणं' संपून 'वाटून घेणं' सुरु झालंय ...
आता शब्द सापडत नाहीत ... आणि त्याची गरजही वाटत नाही ...
कारण आता एकमेकांसमोर स्वतःला सिध्द करण्याची धडपड संपलीय ... "

असं म्हणून तिनं एक कांदा भजी त्याला भरवली ...
शपथ सांगतो ...
त्याच्या बारा वर्षाच्या संसारामधला सगळा खमंगपणा त्या भजीत उतरला होता !!!

जवळ

जवळ नसताना आभास घडवते ती..
तिच्या शब्दांचा भास घडवते ती..
माझ्या स्वप्नात का येते ती..?

समोर नसताना जाणवतो तो स्पर्श तिचा
हवासा वाटतो मंद सहवास तिचा
का कळेना माझ्या स्वप्नात का येते ती..

का कधी कधी अस होत..???

का कधी कधी अस होत..???
आपण कोणावर इतके प्रेम करतो.
.
पण त्याला त्याची अजिबात जाणीव
हि नसते.
.
का कधी कधी अस होत.?
आपले मन कोणासाठी इतके झुरते
.
पण त्याला त्याची अजिबात कदर नसते.
.
का कधी कधी अस होत.?
कि त्या व्यक्ती शिवाय आपण
अजिबात राहू शकत नाही
.
पण ती व्यक्ती आपल्या शिवाय
हि खूप खुश असते...

माझी अंत्ययात्रा


माझी एक इच्छा आहे...
माझी अंत्ययात्रा मला पहायची आहे...
पहायचंय मला, कोण रडतंय माझ्या मरणावर,
अन् पहायचंय कोण हसतंय माझ्या सरणावर...
पहायचंय मला कोण म्हणतय "अरेरे गेला...!",
......अन् पहायचंय मला कोण म्हणतय "बरं झालं मेला...!"
आणि हो... अजुन एक इच्छा ऐका माझी,
मला जाळन्यापुर्वी वाट पहा 'तिची'...
येईल 'ती' जरुर हे मात्र नक्की आहे,
नाहीच आली तर, स्वर्गात भेट आमची पक्की आहे...
माझ्या तिरडीवर लावू नका फुल-तुरे,
तिच्या डोळ्यातून निघालेले दोन अश्रुच पुरे....!
माझ्या मृत्युवर नका करू कळवळT,
तिची सारी प्रेमपत्रे फ़क्त अग्निमद्धे जाळT...
मला अग्नि देता क्षणी ती सुद्धा रडणार आहे,
कारण माझ्यासोबत तिचे ह्रदय सुद्धा जळणार आहे...
मी मेल्यावरच आमचे प्रेम जगाला कळणार आहे...
.
मला बघायचा आहे कोण माझ्या कपड्यान वरून प्रेमळ हात फिरवणार आहे ...
कोण माझ्या फोटो ला कवटाळून ढसा ढसा रडत आहे...
कोण माझी खेळणी न्याहाळत आहे...
कोण माझ्या कविता वाचत आहे....
मला पाहायचा आहे कोण माझ्यासाठी मला आवडणारी खीर घेवून येत आहे...
मला पाहायचा आहे कोण मला अग्नी देता आहे..
मला पाहायचा आहे मला कोणते चार खांदे मिळत आहे आधाराला...
किती जन रडत आहे ...
आणि महत्वाचा राहिलाच किती मित्र आणि खास म्हणजे किती मैत्रिणी मला miss करणार आहे...
मला खरच 
माझ्या साठी किती मुली रडत आहे हे हि मला पाहायचे आहेच... माझी अंत्ययात्रा

१० जुलै, २०१४

असाव कोणीतरी

असाव कोणीतरी वाद घारणार...
खोचा रुसवा आणून पुन्हा आपल्यावरच रागवणार...

असाव कोणीतरी मन मोकळ बोलणार काहि न सांगता अगदी मनातलं ओळखणारं


Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...