कल्पनेच्या सागरातून एकदातरी,
वास्तवी किनाऱ्यावर येशील का?...
तुझ्या आयुष्यातला एखादा क्षण,
माझ्यासाठी खर्ची घालशील का?...
खुप काही नाही मागत तुझ्याकडे,
विश्वासाचे एक नातं जोडशील का?...
ओघळणाऱ्या आसवांना पुसून तु,
तुझ्या क्षणांचा हात हाती देशील का?...
मनाच्या त्या पवित्र रेशीमगाठीचे तु,
अनामिक बंध तोडून टाकशील का?...
आभासाच्या अंधूक नयन पटलाला,
वास्तवाचे क्षितीज दाखवशील का?...
मनात दडलेल्या साऱ्या भावनांना,
तु मैत्रिण म्हणून समजून घेशील का?...
तुझ्याशी भरभरून बोलायचे आहे,
एकदातरी आपलं म्हणून बोलशील का?...
एवढं माझ्यासाठी मनापासून करशील का?..