ad

३० जानेवारी, २०१४

एक दिवस असा होता की,

एक दिवस असा होता की,
कुणीतरी माझ्या, फोनची वाट पहायचं.....
स्वतःच फोन करुन,
मनसोक्त बोलायचं,
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं.....

एक दिवस असा होता की,
कुणीतरी तासनतास,
माझ्याशी गप्पा मारायचं.....

एक दिवस असा होता की,
मनमोकळे पणानं,
मला सर्व काही सांगायचं.....

आज दिवस असा आहे की,
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं,
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं,
वेळ देऊनही फोन नाही करायचं.....

आज दिवस असा आहे की,
मी माझं नातं मनापासुन जपायचं,
मिळालेल्या वागणुकीतून मन मात्र दुःखायचं.....
पण ??? माझं हे दुःख कोणाला कळायचं.....
आज प्रश्न असा आहे की,
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं,
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं.....
का स्वतःचं व दुस-याचं,
जीवन भकास करायचं मित्रा,
आपल्याला नाही हे जमायचं.....

दुःखातही आपण मात्र हसायचं,
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं,
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं.....

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...