प्रेम
खरं प्रेम, खोटं प्रेम, स्वार्थी प्रेम, निस्वार्थी प्रेम, लोचट प्रेम आशे आनेक विविध प्रेमाचे प्रकार.पण माझ्या मते प्रेम म्हणजे दोन जीवांनी एकमेकांमध्ये सामावण्यासाठी , एकमेकांचे होण्यासाठी केलेला आट्टाहास. आणि हो प्रेम हे मनावर, ह्रदयावर असावं लागतं शरीरावर नाही. नाहीतर आजकाल शरीरावर प्रेम करणारे भुंगे तर तुम्हाला पावलोपावली भेटतील ,पण खऱ्या अर्थाने तुमचा विचार करणारी , तुम्हाला जीवापाड जपणारी ,तुमच्या सुखदुःखात सामील होणारी शंभरात एखादी व्यक्ती भेटेल. प्रेम हे नजरेनी नजरेशी करायचं असतं, हृदयाने हृदयाशी करायचं असतं ,मनाने मनाशी करायचं असतं.केवळ शरीरसुखासाठी चार दिवस जवळ येणे म्हणजे प्रेम नव्हे.
प्रेम ही खरतर आत्यंत ओजस्वी ,सकारात्मक ऊर्जा देणारी ,एखाद्या व्यक्तीच्या येण्याने आसमंत उजळून टाकणारी भावना आहे.
प्रेम हे दुःखात आश्रु पुसणार डोकं ठेवायला खांदा पुढे करणार,सुखात मात्र खांद्यावर घेऊन नाचणार असावं. प्रेम हे कोलमडलेल्या उध्वस्त झालेल्या आयुष्याला पुन्हा रुळावर आणणारं असावं ,प्रेम हे साथीदाराच्या डोळ्यातील हावभाव टीपणारच नव्हे तर नजरेने मनातलं ओळखणार असावं ,प्रेम हे वेळप्रसंगी तू नाहीतर मी आस म्हणून पुढे चालायला लावणार असावं.
दोन माणसांनी एकमेकांचे स्वभाव ,मने ,विचार समजावून घेऊन आकर्षण नव्हे मनावर आणि सौंदर्यावर नव्हे विचारांवर मोहित होऊन केलेला आट्टाहास म्हणजे प्रेम.प्रेमात कधी तू त्याची आई होऊन त्याला समजावून घ्याव,कधी त्याने तुझे वडील होऊन तुला समजावून सांगावं,कधी तू त्याला बहीण होऊन माया करावी,कधी त्याने तुला भाऊ म्हणून साथ द्यावी .
माझ्या मते प्रेम म्हटलं एकमेकांची प्रत्येक गोष्ट आपली .त्याच सुखही तुझंच आणि त्याच दुःखही तुझंच .त्याला झालेला आनंदही तुझाच आणि त्याच नैराश्यही तुझंच.खऱ्या प्रेमाला खरंतर वयाची अट नसते .ना समाजाचं बंधन .दोन व्यक्तींना एकमेकांना जीव लावण्यापासून आडवणारा हा कवडीमोल समाज नेमका आहे तरी काय?आजकाल तरुणाई प्रेमात घात झाला,घरच्यांनी नकार दिला ,समाजाने ठोकरल आत्महत्या करते.पण खरंच आत्महत्या हा तुमच्या नात्याचा शेवट किंवा हे इतकं सोपं त्या समस्येचं उत्तर आसत का हो! उलट अशावेळेस एकमेकांवर खर प्रेम असेलतर एकमेकांना खंबीर साथ देऊन परिस्थितीशी दोन हात करायला ,परिस्थिती नम्रपणे आपण हाताळायला शिकायला हवं!
आणि हो,प्रेम हे फक्त एकमेकांनी शरीराने सोबत राहण्यात नव्हे तर दूर/लांब असूनही एकमेकांचे आसण्यात आहे.आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याला प्रेमाचा श्वास म्हणता येईल असा' विश्वास'मात्र दोघांनाही एकमेकांवर असायला हवा.आणि दूर राहूनही जर तो असेल तर मात्र तुमचं प्रेम हे लांब आसूनही तुमचं आख्ख आयुष्य व्यापू शकत.तुम्हाला जगण्याची प्रेरणा देऊ शकत,तुमची सुखदुःख वाटून घेऊ शकत,प्रत्येक गोष्टीत शरीराने नाही पण मनाने तुम्हाला खंबीर साथ देऊन पुढे नेऊ शकत.
शेवटी एवढच सांगेन प्रेम हे एकमेकांवर नितांत विश्वास आसलेल ,एकमेकांना कायम साथ देणार,मर्यादा पाळणार,दोघांपैकी एकावर जरी वेळ आलीतरी आंगावरच नाही तर शिंगावर घेणार,आयुष्यभर मनाच्या हळव्या कोपऱ्यात एकमेकांना जपणारं,एकमेकांना समजून घेणारं आणि समजून सांगणार असावं.
By: via माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।
माझ्या मनातलं तुला सांगायचा खूप प्रयत्न केला, पण तू कधी ते समजून घेतलं नाही... खूप दु:ख आहे माझ्या हसण्यामागे, पण खरंच ते तुला कधी दिसलं नाही... दिसला तो फक्त माझा राग, स्वभाव, पण माझं प्रेम तू कधी जाणलंच नाही...
ad
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Featured Post
माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post
तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...
-
Aapli maitri ek phool ahe, Jyala mi todu shakat nahi, Aani soduhi shakat nahi, Karan,todle tar sukun jaail aani sodle...
-
तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा