ad

२५ एप्रिल, २०१४


दुसर्याला सुख


माणसाचे आयुष्य


मन...


मन... 

देवा चुकतय काय मनाचे तेच कळत नाही रे,
जुनी पाऊलवाट सोडुन
नव्या वाटेवर ते
वळतच नाही रे...
जुन्या वाटेवर ,
जुन्या  क्षणात
शोधतेय कुणाला तरी,
नाहीच काही गावणार
शोधतंय भाभडे
हरवलेले असे काहीतरी...
शोधतांना हरवलेले
स्वतः नाही ना
हरवून बसणार स्वताला ?
भीती  याचीच  रे ,
नाही कुणी वेड्या
मनाला या शोधायला...
एकदा घे रे कुशीत
या माझ्या मनाला,
घेई जशी माऊली
रडक्या तिच्या लेकराला...
सांग कानात त्याला
हरवलंय नाही,
गेलय सोडून तुला ते
पुन्हा न परतण्यासाठी...
कितीही केले प्रेम कुणावर
तरी बांधल्या असतात तुच,
जन्मोजन्मीच्या या रेशीमगाठी
साताजन्माच्या न तुटण्यासाठी,..



ती प्रतिभा कुठे गेली ?


अंतरंगात खोलवर कुठेतरी दडलेली

आणि वेळोवेळी मला छळणारी...ती प्रतिभा कुठे गेली ?

अंधारात चाचपडताना आशेचा किरण बनून
माझ्या रोमरोमी जळणारी...ती प्रतिभा कुठे गेली ?

कधी वसंत कधी शिशिर बनणारी
कधी आपुलेच रंग उधळणारी

आपल्याच धुंदीत जगणारी
सावलीहून अधिक साथ देणारी

कधी जगण्याचे साधन होणारी
कधी श्वासांची जागा घेणारी 

दु:खात अधिकच उफाळून येणारी
आणि सुखात भरभरून देणारी

...एका अपघाताने का प्रतिभा नाहीशी होते ?
मी जिवंत आहे म्हणजे ती ही आहेच...!
प्रतिभा अशी मरणार थोडीच...
कदाचित मी गेल्यावरही असेल ती इथेच
माझ्या आठवणींची शिदोरी बनून...


सुविचार


अजून काय हवे आहे मला ??


गेल्या वेळेस तुला सांगायचे गेले राहून

शब्दच सुचले नाहीत तुझ्या डोळ्यांत पाहून
कोण जाणे तुला त्या वेळेस काय वाटले असेल ?
न बोलता ही मी खूप काही बोलून गेलो
पण त्या प्रेमाचा इशारा तुला ही कळणार असेल
तर अजून काय हवे आहे मला ?



कधीपासून तुझ्यावर प्रेम करत आहे ठाऊक नाही
कधीपासून तुझे वेड लागले आहे हे ही ठाऊक नाही
कसली जादू केलीस काही कळले नाही मला
नजरेने घायाळ करताना माझी दया नाही आली तुला ?
या लाजर्या नजरेनेच तुझ्या जर होकार मिळणार असेल
तर अजून काय हवे आहे मला ?



कधीकधी उगाचच तुला छलावेसे वाटायचे
तुझ्यावर रुसून मी दूर जाऊन बसायचे
जाणून-बुजून दुसर्‍या मुलींशी गप्पा-गोष्टी करायचे
तुझ्यापासून दुरावून मी 'ती'च्या जवळ गेल्याचे पाहून
मनातल्या मनात तू ही जराशी जळणार असेल
तर अजून काय हवे आहे मला ?



रोजचेच होते भेटणे तुला रोजचेच गाणे ही होते
रोजच तुला मेसेज पाठवायला माझ्याकडे बहाने ही होते
तुला ही आवडत होते हे सारे हे ठाऊक मला होते
रोज रात्री येणारा मिस कॉल आज न आल्याचे पाहून
माझ्या काळजीने तुझा जीव तळमळणार असेल
तर अजून काय हवे आहे मला ?



व्हॅलेन्टाईन डे ला मात्र मी सारे वाद विसरायचे
तुझा एका हास्या साठी मी काय काय करायचे
डोळ्यांत डोळे मिसळून तासन् तास घालवायचे
आता उशीर झाला आहे म्हणून जायला तर हवे...पण
माझ्या भोवतीच काही वेळ तुझे पाऊल घूटमळनार असेल
तर अजून काय हवे आहे मला ?



मी नसताना तुझे कशातच लक्ष नसते
मी असताना मात्र बोलायचे सोडून तू लाजत बसते
लाजर्या वेलीहून ही लाजरे ग मन तुझे
रंगलो कधीचाच होतो रंगात प्रेमाच्या तुझ्या
तुझ्या ही मनी रंग प्रेमाचे उधळणार असेल
तर अजून काय हवे आहे मला ?



पहिल्या प्रेमाचे गाणे गायले होते पहिल्या पावसात
भिजलो दोघेही होतो या प्रेमसरींच्या वर्षावात
आता चिंब होते मन तुझे अन् चिंब माझेही मन
तो पाऊस ते क्षण ओले गेले धूक्यात हरवून
पुन्हा आठवणीतच माझ्या प्रत्येक सांज ढ्लनार असेल
तर अजून काय हवे आहे मला ?



मनातल्या मनात तू ही कित्येक स्वप्ने रंगवत असशील
माझ्याच विचारात या स्वप्नांच्या जगात हरवत असशील
माझ्या सहवासाचे क्षण आठवून रात्र-रात्र जागत ही असशील
माझेही तुझ्यावर प्रेम आहे रे कळत का नाही तुला ?
तुझ्या मनीचे प्रेम न सांगता मला ही कळणार असेल
तर हेच हवे आहे मला...हेच तर हवे आहे मला...


आज अचानक तुझी आठवण आली


आज अचानक तुझी आठवण आली

अगदी नकळत सहजपणे
मला वाटला मी तिला विसरणार नाही
पण विसरलो खरा सहजपणे

किती सुंदर होते ते दिवस
जेव्हा तू माझ्या जवळ होतीस
हातात हात नसला तरी
मनातली गुंफाण निरालीच होती
ओथातले शब्द ही मुक्याने
बोलून जायाचिस सहजपणे

माझ्याविणा काही सुचत नसे तुला
प्रेमात इतकी हरवली होतीस तू
मी ही तुझ्यविणा कुठे जगत होतो
वेड मला ही लागले होतेच ना
पण आयुष्याच्या एका वळणावर
वेगळे झालोच सहजपणे

अजूनही तुझी साथ हवी आहेच मला
प्रत्येक अडचणीत आधार म्हणून
अजूनही तुझा स्पर्श हवा आहेच मला
प्रत्येक जखमेवर फुंकर म्हणून
ती ओढ तो स्पर्श ते प्रेम
हरवले सारे सहजपणे

आठवणींचे अंधुक पडदे सारून
सहज स्वप्नात आलीस तू
हात हातातून निसटताना
माझ्यापासून दूर होताना
डोळ्यांतून माझ्या ही अश्रूंची धार
बरसली सहजपणे


हे बंध रेशमी तुझ्यासवे


हे बंध रेशमी तुझ्यासवे

जुळले केव्हा मज ना कळले
प्रेमात तुझ्या होऊनी वेडी
क्षणोक्षणी मेणासम जळले

बंध रेशमी माझ्या मनीचे
तुझ्या मनी अलगद रुजले
तुझीच होऊनी सर्वस्वी मी
स्वप्नी तुझ्या निवांत निजले 

बंध रेशमी नाजूक इतके
जणू ओठांवरी मोरपिसे 
जरी रुतावे काटे मजला
तरी वेदना छळत नसे

बंध रेशमी तुझी नि माझे
शब्दापलीकडचे हे नाते
तुझ्या नि माझ्या मिलन समयी
सांज प्रणयी सरगम गाते 

नाते तुझ्या-माझ्यातले


मी कधी ना तोडले नाते तुझ्या-माझ्यातले

तूच माझ्या पासुनी का दूर जाऊ लागली

मी तुझ्या डोळ्यांमध्ये जी पहिली होती अदा
तीच आता घाव घालूनी डाव साधू लागली

मीच वेडा गात होतो गंजले गाणे जुने
तू नव्याने जीवनाचे गीत गाऊ लागली

श्वास माझे गुंतले होते तुझ्या श्वासामध्ये
तू स्वत:ला जाळूनी मजला ही जाळू लागली

काय म्हणूनी जाहलो होतो तुझा वेड्यापरि
तूच या वेड्याची आता साद टाळू लागली

रिक्त आणिक कोरडे झाले जीणे माझे आता
आज सारी जिंदगी ही व्यर्थ वाटू लागली

मला काय हवे आहे?


मला काय हवे आहे?
माहीत नाही...खरंच माहीत नाही...
मला कसलीच आसक्ती नाही
मी कशाला जगत आहे ? कोणासाठी जगत आहे?
आपल्या लोकांसाठी? छे!
प्रेम, आपुलकी, माया कसलीच बंधने मला बांधत नाहीत
मग काय हवे आहे मला?

पैसा, नाव, प्रसिद्धी की अजून काही?
पण मला कशाचाच लोभ, हव्यास नाही
मला फक्त जगायचंय!
जगण्याच्या उमेदीपुढे सारे थिटे
आणि तितकेच फसवे आणि खोटे !

मला कसलीच गरज भासत नाही
भौतिक गरजा आहेत पण त्या
फक्त शरीर जगवण्यासाठी
मनाचे काय?
ते कुठेच थांबत नाही
कुठेच रमत नाही


काय केले म्हणजे जीवास शांतता लाभेल
नामस्मरण करावे तर देवावर श्रद्धा नाही
काम करावे तर उगाच जीवास त्रास का?

हे असे रोजचेच झाले आहे
आला दिवस ढकलण्याचे
उद्योग तेवढे सुरू आहेत
आणि हे असेच चालू राहणार
शेवटचा श्वास असेपर्यंत
बहुतेक त्यांची तरी साथ लाभेल...!

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...