ad

१ सप्टेंबर, २०१४

तिच नाव लिहून लिहून पुसायला विसरून जातो

तिच नाव लिहून लिहून पुसायला विसरून जातो
तिची जेव्हा आठवण काढतो विसरायला विसरून
जातो...
फार काही सांगायचं असत तिला जे हृदयात आहे
पण जेव्हा पण भेटतो ऐकवायला विसरून जातो...
भेटल्यावर अजून थोडा वेळ तिनं थांबावं असं वाटतं
पण ती भेटली कि तिला थांबवायचं विसरून जातो.....
आता तिच्या शिवाय दिवस सरता सरत नाही
पण नेहमी स्वप्नात तिला हे सांगायच विसरून
जातो...
माझी प्रत्येक संध्याकाळ सांगते विसर तिला आता
पण सकाळ झाली कि तिला विसरायचं हेच विसरून
जातो ....
तिला विसरायचं हेच विसरून जातो .........

‪हृदय‬

"तुम्हाला माहिती आहे
देवाने असे का केले की
आपल्याला दोन हात,
दोनपाय, दोन डोळे दिले
पण ‪‎हृदय‬ मात्र एकच दिले ??
....कारण ह्या पृथ्वीवर येऊन
आपण आपल्या आवडीचे
दुसरे हृदय शोधावे म्हणून.

हसता हसता डोळे अलगद

हसता हसता डोळे अलगद
येतीलही भरून,
बोलता बोलता शब्द
ओठी जतीलही विरुन,
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल
काही नाही,
कुणीतरी आठवण काढतयं,
बाकी काही नाही!!
मोबईल वाजण्याआधीच
तो वाजल्यासारखा वाटेल,
जुनाच काढुन एसएमएस
वाचवासा वाटेल,
दिवस सरता वाटत जाईल उगाचच
उदास,
पावलोपावली जड होत जाईल
बहुधा श्वास,
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं
बिलकुल काही नाही,
कुणीतरी आठवण काढतंय,
बाकी काही नाही!!!
जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका,
घरचे म्हणतील
सारखा कसा लागतो उठता बसता.
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे
थोडे.
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे
थोडे.
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल
काही नाही,
"कुणीतरी आठवण काढतंय,
बाकी काही नाही!!!

कॉलेज

कॉलेज केव्हाचं सुरु झालंय.सर्वक्लास पुर्णपणे भरलेत.तिसर्या पिरेडची बेल वाजली.लाट मॅडमचा पिरेड संपला होता.मॅडम अजुन जायच्या होता.पौर्णिमा गडबडीने क्लासमध्ये आली,पावसाने चिँब भिजली होती ती.मॅडमांना काही सांगायची गरज नव्हती,पावसामुळेउशीर झाला असेल म्हणुन त्यांनी तिला बसायला सांगितलं आणि त्या निघुन गेल्या.प्रदीप पौर्णिमाला सारखं विचारत होता.एवढं भिजत यायचीकाय गरज होती?एक दिवस आली नसतीस तर चाललंअसतं ना....ती म्हणाली,हो पण तुला एक दिवस न बघणं चाललं मला चाललं नसतं.प्रदीप अलगद खाली बघुन हसला.किती प्रेम आहे तुझं माझ्यावरअसं म्हणुन तिच्या हातावर हात ठेवला.तिचं अंग खुपच तापलं होतं.त्याला एकदम चटका बसला.अगं तुला तर खुप ताप आलाय आणि तरीही तु इथवर आलीस.तुला तर ना मी आता..,.पुढे काही बोलण्याच्या आतच कांबळे सर तिथेआले,प्रदीप लगेच आपल्या जागेवर गेला.आणि सर्वजण gd moning sirम्हणत उभे झाले...sit downपौर्णिमा सोडुन.... पौर्णिमाला उभं राहायला सांगितल्याबद्दलसर्वच आश्चर्यचकित झाले.प्रदीप जरा जास्तच आश्चर्यचकित झाला.....कांबळेसरःबाळ तुला इतका उशीर का झाला?(सर थोडे कडक शिस्तीचे होते,त्यांनी तिला उशीरा येताना पाहीलं होतं)...पौर्णिमाःसर पाऊस आला होता?..पाऊस आला होता तर यायचं नव्हतं कॉलेजला,हात पुढे कर....तिने हात पुढे केला सर तिला छडी मारणार तेवढ्यात प्रदीप ओरडला सर थांबा....ती वेळेवर आलीय हवंतर विचारा सर्वांना...हो का?मी प्रत्यक्ष पाहीलं नसतं यावर विश्वासही ठेवला असता कदाचित,..असं म्हणुन ते पुन्हा छडी मारणार तेवढ्यात तो पुन्हा मधी बोलला.आता ते चिडले आणि पहीला त्यालाच छडीने सरांनी हाणलं.प्रदीप ने पौर्णिमाला पुरपुर वाचवण्याचा प्रयत्न केला.पण तिसर्यावळी सर तिला मारताना तिने डोळे मिटले आणि धाड करुन खिडकीचे दार वार्याने धडकले गेले.तिने डोळे उघडले तेव्हातिथे कोणीही नव्हतं.सर्व बँचेस मोकळे होते.बाहेर धो धो पाऊस पडत होता.तिच्या आईने लगबगीने छत्री घेऊन वर्गात प्रवेश केला.....मित्रांनो या कथेला इथे थोडा pause देऊया. आत्ता तुम्ही म्हणाल तिथे कोणीचनाहीये,सर्व कोठे गेले...सांगतो...पणहे सांगण्यासाठी मला तुम्हाला थोडं PASTमध्ये न्यावंलागेल.चला तर मग...एका वर्षापुर्वी...आजपासुन बारावीचे एक्झाम्स चालु झालेत.प्रदीप आणि पौर्णिमा हे वेगवेगळ्या कॉलेजचे पण त्यांचा exam no एकाच कॉलेजमध्ये एकाच क्लासमध्ये पडला आहे.त्यामुळे ओळख वाढवण्यासाठी प्रदीप सुरुवात करतो...हाय माझं नाव प्रदीप...तीःआणिमाझं पौर्णिमा.,.तोःरागावणार नसशील तर एक सांगु का?तीःहो सांग ना.तोःतु खुप सुंदर आहेस.तुझ्या कपाळावर एक चंद्रकोर असती ना तर त्या चंद्रकोरीलाही तुझ्यामुळे शोभा आली असती.ती लाजुन थँक्स म्हणाली.त्याचा हा कॉन्फीडंस आणि स्पष्ट वक्तेपणा तिला खुप आवडला.अशी त्यांची मैत्री झाली.दोनतीन पेपर व्यवस्थित गेले पण एका पेपरच्यावेळी तिच्या पायात कोणीतरी कॉपीटाकली जे तिला कळलं नाही.त्यावेळेसचनिरीक्षकांच्या नजरेत ही कॉपी पडल्यावर त्यांनी पौर्णिमाला जबाबदार धरलं.ती खुपच विनंती करुन त्यांना सांगत होती किही माझी कॉपी नाही।पण त्यांनी ऐकलंनाही शेवटी प्रदीपने तो आळ आपल्या डोक्यावर घेतला आणि तो म्हणाला,सर ही कॉपी माझी आहे आणिती मीच हिच्यापायात टाकली होती.त्यामुळे त्या सरांनी पौर्णिमाला सोडुन प्रदीपच्या पेपरवर लाल शेरा मारला.पौर्णिमेला माहीत होतं की हा खोटं बोलतोय कारण इतका स्मार्ट मुलगा कॉपी कसा काय करेल?पेपर संपल्यावर ते भेटले तेव्हा तिने स्पष्टच विचारलं.तुकॉपी केली नसताना ती तुझि कॉपी आहे असं का म्हणालास?...तुला वाचवण्यासाठी....पण का?तु कोण आणि मी कोण आपलं नातच काय?दोन दिवसाच्या मैत्रीखातर कोणी असं करतं का?बरोबर आहे कदाचित.पण दोनदिवसाच्या प्रेमाखातर असं कोणीही करु शकतं,नाहि?...म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम....हो तुला बघताक्षणीच झालं होतं ते पण प्रपोज असं करावं लागेल याची जरादेखील कल्पना नव्हती मला.बोलकरशील माझ्याशी लग्न?तिला त्याची एक वेगळी पद्धत,स्पष्टपणेबोलणं आवडलं आणि तिने पटकन हो म्हटलं।काहि दिवसांनी एकाच कॉलेजमध्ये त्यांचं अॅडमिशन झालं.त्यांचं प्रेम फुलत गेलं.पण एक दिवस कॉलेज भरलेलं असताना धो धो पडणार्या पावसाने कॉलेजच्या बिल्डींगचा एक भाग कोसळला.त्यामध्ये चाळीस विद्यार्थी,विद्यार्थींनीचा मृत्यु झाला आणि 100 च्या वर जखमी झाले...प्रदीपचंनाव मृतांमध्ये होतं तर पौर्णिमाचं जखमींमध्ये होतं....होत्याचं नव्हतं झालं.उकळत्या दुधामध्ये विरझण पडावं तसं त्यांच्या प्रेमामध्ये दुर्दैवाने उडी घेतली होती.पौर्णिमाचाजीव तर वाचला पण तिच्या मनावर या घटनेचा जबर मानसिकआघात झाला तिच्या पालकांनी यावर उपचारासाठी प्रयत्न केले पण तिने योग्य प्रतिसाद दिला नाही.....तेव्हापासुन आजपर्यँत जवळजवळ रोज ती कॉलेजमध्ये येत असते.आजतर तिने कहरच केला 100 डिग्रीचा ताप आला असतानादेखील ती कॉलेजमध्ये पावसात भिजत आली होती.त्या खिडकीचीदारे सुटलेल्या वार्याने धडकत होती,तिचे केस उडत होते.तीची आई छत्री घेऊन तिथे आली.आणि पौर्णिमाला भिजलेल्या डोळ्यांनी म्हणाली,कितीवेळा तुला इथे आणायलायायचं बाळ.रोज तु न सांगता इथे येतेस.काय झालंयते तरी सांग.आजपर्यंत तुला कितीवेळा समजावलं पण आज फणफणत्या अंगाने सुद्धा तु इथे आलीस.असं म्हणत त्या पौर्णिमालाघेऊन गेल्या.त्यांना माहीत होतंकी हीला मानसिक आजार झालाय.पौर्णिमाला याची कल्पना दिला गेली असतानादेखील तिने उपचारास नकार दिला.हा माझा मानसिक आजाराच का असेना पण तो मला रोज भेटतो हेच माझ्यासाठी खुप आहे.उपचारानंतर तो मला कधीही दिसणार नाही म्हणुन आजपर्यँत ती उपचार न घेता तशीच राहीली...फक्त त्याच्यासाठी.,....मित्रांनोपौर्णिमाने प्रदीपवर केलेल्या नितांत प्रेमासाठी,त्याच्या एका भेटीसाठी तिला झालेल्या मानसिक आजारालाच तिनं आयुष्य बनवलं.म्हणुनच पौर्णिमेच्या आयुष्यात कायमची आमावस्या आली.

💕एकदा वेड आणि प्रेम ह्या दोघांनी

💕एकदा वेड आणि प्रेम ह्या दोघांनी
लपा-छपी खेळायचे ठरवले,
💕वेड्यावर राज्य होत, तो १,२,३
....असे आकडे म्हणू लागला,
💕इकडे प्रेम लपण्यासाठी जागा
बघत होत, पण प्रेमाला प्रेमाची
जागाच मिळत नव्हती,
💕वेड्याचे
आकडे जेव्हा संपत आले तेव्हा
प्रेमाने पटकन समोरच्या झुडपात
उडी टाकली,
💕 ते झुडूप गुलाबांच्या
फुलांच होत आणि तेथे प्रेम लपून बसलं .............
💕वेड्याने प्रेमाला भरपूर शोधलं,
पण प्रेम काही मिळाले नाही,
💕शेवटी स्वताहाची हार
सहन न झाल्या मुळे
वेड्याने चिडून समोरच्या झुड्प्यात
जोराने काठी खुपसली व
बाहेर काढली ........
💕बाहेर काढल्या नंतर काठीला
लागलेलं रक्त बघून
वेड दचकला त्याने झुडूपा मध्ये
वाकून बघितलं,
💕तेव्हा तिथे त्याला हसत
असलेल प्रेम दिसलं,
💕पण तो पर्यंत ते प्रेम आंधळ झाल
होत कारण ती काठी त्या प्रेमाच्या
डोळ्यात खुपसली गेली होती ..........
💕ते पाहून वेड खूप रडला आणि
त्याने प्रेमाला वचन
दिले कि इथून पुढे तू माझ्या
डोळ्यांनी बघशील
💕म्हणजेच मी नेहमी तुझ्या आधारासाठी
तुझ्या बरोबर राहीन .............
तेव्हा पासून प्रेम हे आंधळ आहे
आणि प्रत्येक जण प्रेमात वेडा आहे.
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नका
सोय म्हणून सहज असं तोडू नका
रक्ताचं नाही म्हणून,
कवडीमोल ठरवू नका..
भावनांचं मोल जाणा ,
मोठेपणात हरवू नका.
आयुष्याच्या प्रत्येक वळणात
नवं नातं जुळत असतं,
जन्मभर पुरेल इतकं भरून
प्रेम मिळत असतं,
तुम्ही फक्त ओंजळ पुढे
करुन पहा,
कमीपणा मानू नका,
व्यवहारातलं देणं घेणं
फक्तं मध्ये आणू नका..
मिळेल तितकं घेत रहा,
जमेल तितकं देत रहा,
समाधानात तडजोड असते
फक्त जरा समजून घ्या
'नातं ' म्हणजे ओझं नाही,
मनापासून उमजून घ्या..
विश्वासाचे चार शब्दं ..
दुसरं काही देऊ नका
जाणीवपूर्वक 'नातं' जपा..
मध्येच माघार घेऊ नका...
.
शब्दांना भावरूप देते,
. . . तेच खरे पत्र ॥
नात्यांना जोडून ठेवते,
तेच खरे गोत्र ॥
नजरे पल्याड पाहू शकतात तेच,
खरे नेत्र ॥
दूर असूनही दुरावत नाही,
तेच खरे मित्र. ॥॥

हसतेस एवढी छान की,

हसतेस एवढी छान की,
हसत रहायला शिकवलेस तू..
बोलतेस एवढी छान की,
बोलत रहायला शिकवलेस तू..
लाजतेस एवढी छान की,
मला आवडायला लागलीस तू..
जीव एवढा लावलास की,
प्रेम करायला लावलेस तू,
किती प्रेम करतेस तू..
एवढ प्रेम नको ना करूस,
मग काय झाल अचानक..
सोडून मला का गेलीस तू,
गेलीस तर गेलीस..
पण तुला विसरु कसा,
हे शिकवायला विसरलीस बघ तू..
ए,
ते शिकवायला तरी परत येशील ना गं तू..???

tai


८ ऑगस्ट, २०१४

जिवन



मोर नाचताना सुद्धा रडतो…
आणि..
राजहंस मरताना सुद्धा गातो….

दुःखाच्या रात्री झोप कुणालच लागत नाही…
आणि.. सुखाच्या आनंदात कुणीहीझोपत नाही

यालाच जिवन म्हणतात…..

एक हृदयस्पर्शी कथा.... तो अजुनहि झोपलाच होता,





एक हृदयस्पर्शी कथा.... तो अजुनहि झोपलाच होता,
वर टांगलेल सलाईन
वाऱ्या निशी हालत होत.
त्यातून टपकनारे थेँब
त्याच्या रक्तात भिनत
होते.झोप कसली येत होती त्याला...??
उघड्या डोळ्याने तो एकाच
ठिकानी बघत होता.
त्याची आई औषधे व गोळ्या घेवून
आली, त्याला थोडे फार
खाण्याची विनंती केली. पण
त्याने गप्प राहून नकार दिला,
आई गेल्यानंतर त्याने
एका हाताने औषधे व
गोळ्या घेतल्या........ . घड्याळाच्या टोलानीँ त्याचे
लक्ष वेधले. सहा वाजले होते,
त्याने चटकन चादर
बाजूला केली ' अरे बापरे ! क्लास
तर संपून गेला असेल ' अंगात
एवढेही बळ नसताना त्याने हातातली सुई खेचून
काढली. भळ-
भळनाऱ्या रक्तावर
कापसाचा बोळा पकडून
तो सायकल जवळ गेला.
त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हत. भर पावसात
तो सायकल घेवून क्लासकडे गेला.
क्लास तर केव्हाच संपून
गेला होता. बहूतेक सर्वजण
घरी निघून गेले होते
थोडी पावसाची भूर-भूर चालूच होती.... ती आजून
हि क्लासच्या बाहेरत्याची वाट
पाहत
उभीच
होती. त्याला बघितल्यावर
तिचे डोले चमकले. तिला त्याचा राग आला होता,
झपझप चालत
त्याच्याजवळ पोहचली.
त्याच्या डोक्यावर छञी पकडून
त्याचा कान धरला, "तू
आजारी असताना इथं का आलास ?
आणि पून्हा छञी विसरलास,
बापरे ! किती पाणी"
त्याच्या डोक्यावरून
पाणी झटकत ती म्हणाली,
"पूर्ण ओला झालाय आणि मग
सर्दी झाली म्हणजे मलाच
म्हणशिल......" अरे ! किती बडबड
करते मी ? जाऊ दे बरं, डाँक्टर
काय म्हाणालें तब्येत कशी आहे?
दोघेही क्लासच्या बाहेर पायरीवर जाऊन
बसले. तो अजूनही काकडत होता.
तिच्या डोळ्यामध्ये त्यांचे
बावरलेलं मन स्वत:ची खोलवर
रूजलेली प्रतिमा शोधत
होत. तिचे निरागस डोळे माञ
सदैव त्याच्याच चिँतेत बूडालेलेदिसत
होते.
त्याच्या अतिभोळेपनाची तिला काळजी वाटायची,
त्याच्या प्रेमाच्या वेडेपणाची सीमा अजून
तिलाही ठरवता आली नव्हती.
त्याच्या कपाळावर तिने हात ठेवला आणि ती दचकलीच,
" बाप रे ! किती भयंकर ताप
आलाय तूला ! अन, तरी तू
एवढ्या पावसात
मला भेटायला आला?
तूला काही झालं म्हणजे? नाही मीच
वेडी आहेँ. मीच थांबते ना !
आता मी थांबणारच नाही, तू
बघच मी, थांबतच नाही ! असं
द्रृष्ट लागण्याजोगे प्रेम
बघून त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी जमा झालं,बोलण्याचा प्रयत्न
करताच त्याला खोकला आला. तिने त्याला न
बोलण्याची विनंती केली.
त्याचा हात आपल्या हातात
घेताच, तिने हातावरुन
ओघळणारे लाल रक्त बघीतले.
ती यावेळी माञ चिडलीच, "तू हे काय केलंस? तू सलाईन
काढले ना? का स्वता:ला ञास
करून घेतोस?
तुला होणाऱ्या वेदना काळजात
सूई प्रमाणे घुसतात,जा !
मी बोलणारच नाही. अरे तुला काही झाले म्हणजे
मी आणि माझे जीवन........... ..."
त्याने तिच्या ओठांवर
हात ठेवला. पुढचे शब्द
काळजाला चिरणारे
होते.त्याच्या डोळ्यातून थेँब
ओघळला. तिच्या निस्सिम
प्रेमासाठी-
आणि तिच्यासाठी,तरीह ी त्याच्या डोळ्यातल्या अश्रुनी तिला अस्वस्थ
करुन टाकले.
तिच्याहि डोळ्यांतून
पाणी टपकत होते,"खरच,
इतक प्रेम करतोस का रे
माझ्यावर... मग का असा ञास
देतोय? तुझ्या या वेडेपणानेच
मला वेड
लावंल-तुझ-तुझ्य
ा प्रेमाचंमी सुध्दा इतकी वेडी आहे
ना- मी थांबते म्हणून तर तू येतोस.
दोघेपण अगदी वेडे आहोत.
तिने त्याच्या खांद्यावर मान
टेकवली. तिचे डोके थापटत, तो माञ
कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात
हरवून
गेला होता, तिथे फक्त
तिच्या बांगड्यांची किण-किण
आणि तिचा आवाज कानी येत होता. तेवढ्यात
त्याच्या सरांची थाप
त्याच्या पाठीवर पडली, "
काय रे ? केव्हाचा आवाज देतोय-
काय करतोय इथं एकटा ?
एवढ्या पावसात का बसलाय ? घरचे म्हणत होते तू आजारी आहेस
म्हणुन "
सरांच्या आवाजाने तो भानावर
आला.... त्याने मान
डोलवली. सर आत निघून गेले. भरलेल्या डोळ्यानी किँचित
मागे वळूनपाहिले.
क्लासमध्ये
टांगलेल्या तिच्या फोटोची माळ
वाऱ्यानिशी हालत होती.
ती क्लास मधली एक हूशार विद्यार्थीनी होती...!!! सर्व
काही द्रृष्ट
लागल्या प्रमाने घडून गेलं होत.
स्वप्नाहूनही सुंदर
अशा त्यांच्या दुनियेवर काळाने
अशी झडप घातली कि त्या दुनियेतील
सर्व सुख काळ
आपल्या बरोबर घेऊन
गेला होता. फुलांआडून
डोकवणाऱ्या तिच्या डोळ्यामध्ये
घोर चिँता दिसून येत होती.
कोण समजून घेणार
माझ्या या वेड्याला ? कोण
शिकवणार याला माझ्याशिवाय जगणं?
कोणी जपेल
का याला माझ्याप्रमाणे? असे
अनेक प्रश्न तिला पडले
असावे. त्याचे मन माञ
एखाद्या वेड्या हरणाप्रमाणे तिच्या सावलीमागेच पळत
होतं, ते हेमानायला तयारच
नव्हत की तिच अस्तित्व
आता संपलय म्हणून. असे सावल्यांचे खेळ-आभास
त्याच्या जिवनाचा एक भागच
बनून गेले होते. ह्रूदयात जपून
ठेवलेल्या तिच्या आठवणी अश्रु
बनुन क्षणा-
क्षणाला बाहेर पडत होत्या. तिची प्रतिमा डोळ्यामध्ये
भरून जड अंत:करनाने तो सायकल
जवळ गेला. काकडंत- काकडत
त्याने सायकल घेतली वघराकडे
चालू
लागला आणि चालता- चालता बेशुध्द होऊन पडला...... हे सर्व प्रेम होत कि वेड !
मी त्यावेळी हे सारे फार जवळून
बघितले होते.
का कुणीतरी इतकही प्रेम करू
शकत ? हे
असं कसं प्रेम होत जे म्रूत्युनंतर सुद्धा जिंवतहोत?
खरचं त्याच्या वेडे
पणाला म्रूत्युच्याही मर्यादा कमी पडल्या होत्या....
या अगोदर तो खुप
चांगला असायचा,
क्षणोक्षणी त्याच्या चेहऱ्यावर आनंद असायचा, पन
त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर
हास्य मी पहीलेच नाही. आता त्याने आपल्या मनावर
ताबा मिळवलाय.
सर्वाशी तो चांगला वागतो अगदी पूर्वीप्रमाणे.
पण फरकएवढाच आहे
की तो पूर्वी सर्वाशी बोलु
शकत होता. त्यावेळी आजारात त्याने
आपली वाचा गमावली होती.
त्या दोघांच्या सुखासमोर
स्वर्गसूद्धा फिका पडत
असावा म्हणुन
देवालाही हेवा वाटला आणि............ .... जे खरोखर चांगल घडत असतं तेथेच
नशिब तोकडे पडते
हा प्रश्न तर फार पूर्वीपासून
अनुत्तरीतच आहे. ...... असचं
नेहमी का घडतं? का ?

तू आणि मी..!!



पाऊस आणि जमीन यांच किती सुंदर प्रेम.

जमीन झेलायला आतुर पावसाचा प्रत्येक थेंब,

माझ्या जीवनात तू पावसासारखं बरसावं,

त्यासाठी मी रात्रंदिवस तरसावं,

तू बरसण्यासाठी आणि मी तरसण्यासाठी,

एकच गोष्ट आवश्यक आहे,

ती म्हणजे, तू आणि मी..!!

७ ऑगस्ट, २०१४

आपुलकी


मागचे सगळे वीसरुन आता शीकावे
स्वताहाचे आयुश्य जगायला... 
इथे कोणालाही नसतो वेळ 
कोणाबरोबर आपुलकीने वागायला... 


Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...