तुझ्या प्रत्येक सुखात
भागीदार व्हायचं ...
तुझ्या प्रत्येक दुखात तुझा
आधार व्हायचं .....
तुझ्या प्रत्येक श्वासातला
श्वास व्हायचं .....
तुझ्या प्रत्येक ठोक्यातील
भाग व्हायचं... ...
तुझ्या मनातील वेदनांचे
मलम व्हायचेआहे.....
देवा जवळच्या प्रार्थनेतील
मागणं व्हायचं... .
तुझ्या अंधारलेल्या जीवनातील
दिवा व्हायचं... ..
तुझ्या डोळ्यातील स्वप्न व्हायचं
तुझ्या हसण्याचे कारण
व्हायचे आहे....
श्वासाच्या शेवटल्या क्षण
पर्यंत तुझ व्हायचं...
माझ्या मनातलं तुला सांगायचा खूप प्रयत्न केला, पण तू कधी ते समजून घेतलं नाही... खूप दु:ख आहे माझ्या हसण्यामागे, पण खरंच ते तुला कधी दिसलं नाही... दिसला तो फक्त माझा राग, स्वभाव, पण माझं प्रेम तू कधी जाणलंच नाही...
ad
१४ डिसेंबर, २०१४
तुझ्या प्रत्येक सुखात
१३ डिसेंबर, २०१४
खरे प्रेम
खरे प्रेम असावे…..
कमळासारखे,
जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही, त्याच्याशि वाय ते कधीच उगवत नाही….
खरे प्रेम असावे…..
गुलाबासारखे,
जे कोमल आणि सुगंधी जरी असले,
तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही….
खरे प्रेम असावे…..
आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण. .
कुठेही गेले तरी न संपणारे,
सदैव आपल्या बरोबर असणार कारण…..
प्रेम हा काही खेळ नाही,
टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही
११ डिसेंबर, २०१४
प्रेमाच्या वेलीवर
प्रेमाच्या वेलीवर सर्वच फ़ुले फ़ुलतात असे नाही जीव जेवढा आपण लावावा तेवढा सर्व लावतात असे नाही प्रेमा सारखे बंधन ज्याला सिमा नसतात हे आपण जाणतो पण प्रेमाच्या बंधनाला सर्वच जाणतातच असे नाहीकुणी तरी म्हटलय प्रेमा मध्ये हातावरील रेषांना ही.. आपल्या वाटा बदलाव्या लागतात पण त्या वाटा बदले पर्यंत सर्वच थांबतात असे नाही..
१ सप्टेंबर, २०१४
तिच नाव लिहून लिहून पुसायला विसरून जातो
तिची जेव्हा आठवण काढतो विसरायला विसरून
जातो...
फार काही सांगायचं असत तिला जे हृदयात आहे
पण जेव्हा पण भेटतो ऐकवायला विसरून जातो...
भेटल्यावर अजून थोडा वेळ तिनं थांबावं असं वाटतं
पण ती भेटली कि तिला थांबवायचं विसरून जातो.....
आता तिच्या शिवाय दिवस सरता सरत नाही
पण नेहमी स्वप्नात तिला हे सांगायच विसरून
जातो...
माझी प्रत्येक संध्याकाळ सांगते विसर तिला आता
पण सकाळ झाली कि तिला विसरायचं हेच विसरून
जातो ....
तिला विसरायचं हेच विसरून जातो .........
हृदय
देवाने असे का केले की
आपल्याला दोन हात,
दोनपाय, दोन डोळे दिले
पण हृदय मात्र एकच दिले ??
....कारण ह्या पृथ्वीवर येऊन
आपण आपल्या आवडीचे
दुसरे हृदय शोधावे म्हणून.
हसता हसता डोळे अलगद
येतीलही भरून,
बोलता बोलता शब्द
ओठी जतीलही विरुन,
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल
काही नाही,
कुणीतरी आठवण काढतयं,
बाकी काही नाही!!
मोबईल वाजण्याआधीच
तो वाजल्यासारखा वाटेल,
जुनाच काढुन एसएमएस
वाचवासा वाटेल,
दिवस सरता वाटत जाईल उगाचच
उदास,
पावलोपावली जड होत जाईल
बहुधा श्वास,
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं
बिलकुल काही नाही,
कुणीतरी आठवण काढतंय,
बाकी काही नाही!!!
जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका,
घरचे म्हणतील
सारखा कसा लागतो उठता बसता.
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे
थोडे.
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे
थोडे.
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल
काही नाही,
"कुणीतरी आठवण काढतंय,
बाकी काही नाही!!!
कॉलेज
💕एकदा वेड आणि प्रेम ह्या दोघांनी
लपा-छपी खेळायचे ठरवले,
....असे आकडे म्हणू लागला,
बघत होत, पण प्रेमाला प्रेमाची
जागाच मिळत नव्हती,
💕वेड्याचे
आकडे जेव्हा संपत आले तेव्हा
प्रेमाने पटकन समोरच्या झुडपात
उडी टाकली,
💕 ते झुडूप गुलाबांच्या
फुलांच होत आणि तेथे प्रेम लपून बसलं .............
💕वेड्याने प्रेमाला भरपूर शोधलं,
पण प्रेम काही मिळाले नाही,
💕शेवटी स्वताहाची हार
सहन न झाल्या मुळे
वेड्याने चिडून समोरच्या झुड्प्यात
जोराने काठी खुपसली व
बाहेर काढली ........
💕बाहेर काढल्या नंतर काठीला
लागलेलं रक्त बघून
वेड दचकला त्याने झुडूपा मध्ये
वाकून बघितलं,
💕तेव्हा तिथे त्याला हसत
असलेल प्रेम दिसलं,
💕पण तो पर्यंत ते प्रेम आंधळ झाल
होत कारण ती काठी त्या प्रेमाच्या
डोळ्यात खुपसली गेली होती ..........
💕ते पाहून वेड खूप रडला आणि
त्याने प्रेमाला वचन
दिले कि इथून पुढे तू माझ्या
डोळ्यांनी बघशील
💕म्हणजेच मी नेहमी तुझ्या आधारासाठी
तुझ्या बरोबर राहीन .............
तेव्हा पासून प्रेम हे आंधळ आहे
आणि प्रत्येक जण प्रेमात वेडा आहे.
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नका
सोय म्हणून सहज असं तोडू नका
रक्ताचं नाही म्हणून,
कवडीमोल ठरवू नका..
भावनांचं मोल जाणा ,
मोठेपणात हरवू नका.
आयुष्याच्या प्रत्येक वळणात
नवं नातं जुळत असतं,
जन्मभर पुरेल इतकं भरून
प्रेम मिळत असतं,
तुम्ही फक्त ओंजळ पुढे
करुन पहा,
कमीपणा मानू नका,
व्यवहारातलं देणं घेणं
फक्तं मध्ये आणू नका..
मिळेल तितकं घेत रहा,
जमेल तितकं देत रहा,
समाधानात तडजोड असते
फक्त जरा समजून घ्या
'नातं ' म्हणजे ओझं नाही,
मनापासून उमजून घ्या..
विश्वासाचे चार शब्दं ..
दुसरं काही देऊ नका
जाणीवपूर्वक 'नातं' जपा..
मध्येच माघार घेऊ नका...
.
शब्दांना भावरूप देते,
. . . तेच खरे पत्र ॥
नात्यांना जोडून ठेवते,
तेच खरे गोत्र ॥
नजरे पल्याड पाहू शकतात तेच,
खरे नेत्र ॥
दूर असूनही दुरावत नाही,
तेच खरे मित्र. ॥॥
हसतेस एवढी छान की,
हसत रहायला शिकवलेस तू..
बोलतेस एवढी छान की,
बोलत रहायला शिकवलेस तू..
लाजतेस एवढी छान की,
मला आवडायला लागलीस तू..
जीव एवढा लावलास की,
प्रेम करायला लावलेस तू,
किती प्रेम करतेस तू..
एवढ प्रेम नको ना करूस,
मग काय झाल अचानक..
सोडून मला का गेलीस तू,
गेलीस तर गेलीस..
पण तुला विसरु कसा,
हे शिकवायला विसरलीस बघ तू..
ए,
ते शिकवायला तरी परत येशील ना गं तू..???
८ ऑगस्ट, २०१४
Featured Post
माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post
तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...
-
Aapli maitri ek phool ahe, Jyala mi todu shakat nahi, Aani soduhi shakat nahi, Karan,todle tar sukun jaail aani sodle...
-
तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...