ad

२१ डिसेंबर, २०१४

तुझ्याविणा एक क्षणही करमत नाही.


तुला एकटक पाहीलं की,
मला काय होतं,
काहीच कळत नाही.....

तुझ्याशी बोललो की,
मी का अबोल होतो,
काहीच वळत नाही.....

तुझ्या मिठीत आलो की,
मी का स्वतःला विसरतो,काहीच उमजत नाही.....

तुझ्यात गुंतलो का,
मी का बेभान होतो,
काहीच समजत नाही.....

तुझ्याडोळ्यात बघितलं की,
मी का तुझ्यात हरवतो,काहीचउमजत नाही.....

तुझ्याजवळ असलो की,
फक्त तुलाच पहावसं वाटतं,काहीच दुसरं दिसत नाही.....

तु लाजलीस की,
फक्त तुझ्या ओठांच हसू बनतो,काहीच जमत नाही.....

मनापासून खरं सांगायच तर,पिल्लू,
जानू, 
शोनू,
मला ना,
तुझ्याविणा एक क्षणही करमत नाही.

अन् आज खरंच ना तुझी कमी जाणवली'



अन् आज खरंच ना तुझी कमी जाणवली'

जीवनात टाकलेल्या प्रत्येक पावलांवरी,नकळतपणे माझी पापणी सये पाणावली...

काळजातली एक आर्त जखम चिघळली,
अन् आज खरंच ना तुझी कमी जाणवली...

आजवर तुझ्या आठवणीची होती सावली,सुख दुःखाच्या प्रवासात माझिया मनावरी...

तुझ्या ही सावली कुणी अनामिक गं केली,अन् आज खरंच ना तुझी कमी जाणवली...

तु होतीस प्रतिक्षेतल्या क्षणाला सावरणारी,वेळोवेळी मला योग्य ते मार्गदर्शन करणारी...कुणीतरी माझ्या मनाचीच दिशा बदलवली,अन् आज खरंच ना तुझी कमी जाणवली...

कुणीतरी आज उडवली भावनेची खपली,अन् आसवे डोळ्यातून गं सये ओघळली...

परकेपणा अनुभवला भावनांच्या बाजारी,अन् आज खरंच ना तुझी कमी जाणवली...

आठवण माझीही येइल मी गेल्यावर...!

आठवण माझीही येइल मी गेल्यावर...!
खरे प्रेम केल्याचे हे फळ......
प्रत्येक प्रेमकरानार्याने जरुर वाचावे...

आठवण माझीही येइल मी गेल्यावर...!
रात्रि झोपेतून दचकून मी जागा होतो,
अणि या अंधारात तुला शोधायचा प्रयत्नमी करतो,

हताश होउन पुन्हा झोपायचा प्रयत्न 
मी करतो,
तेवढ्यात एक अश्रु डोळ्यातून गालावर ओघलतो,
सुरु होतो आठावनिचा तो खेळ,
नाही रहात पुन्हा झोपायचा ताल-मेळ,
असे का होते की आपण ज्या व्यक्तीवर प्रेमकरावे,
त्या व्यक्तीने क्षणात आपल्याला सोडून जावे,
आणि 
स्वप्नाच्या दुनियेत बांधलेले घर,
खाडकन फुटावे,
कुठे कमी पडत होतो,
प्रत्येक वेळी तुलाच तर समजुन घेत होतो,

तुझ्यावर येणार्या संकटाना,
परतीचा रस्ता मी दाखवत होतो,
तू केलेल्या प्रत्येक चुकावर,
माफ़ी मी मागत होतो,

तुझ्या चुकानी होणार्या त्रासाने ,
वेळोवेळी मीच रडत होतो,
तुझ्याकडून झालेली चुक तुला 
कधीच दिसली नाही,
माझ्या डोळ्यातून येणार्या अश्रुनाही 
किम्मत राहिली नाही,
कामाचा दबाव आहे असे म्हणून,
तू माला टाळत होतीस,
पण या कारणा खाली,
तूच माझ्या पासून दुरावत होतीस,
काम तेव्हा मीही करत होतो,
माझ्या कामाचा दबाव तुला दाखवत नव्हतो,
वाटत होते तुला माझ्या 
साथाची गरज आहे,
तुलाच मी समजुन घेणे हेच माझ्या नशिबात आहे,
तुझे काम हे कधी संपले नाही,
आपल्यातील वाढत गेलेले अंतर,
हे तर कधीच मिटले नाही,
दरोज झोपताना देवाकडे एकच गार्हने असते,
तू सदैव खुश रहावी हेच माझे मागणी असते,

आशा आहे तू पुन्हा माझ्याकडे परतावी,
पण तू येणार नाही हे वास्तव स्वीकारता येत नाही,
प्रेम माझे संपणार नाही मी मेल्यावर,
पण आठवण माझीही येइल मी गेल्यावर...
आठवण माझीही येइल मी गेल्यावर

विश्वास


              विश्वासावर होतो जीच्या मी 

                 झाली नाही माझी ती 
                 बुडत होती नौका मनाच्या जेव्हा 
                 समोरच होता किनारा तेव्हा 
                 विश्वासावर होतो जच्या मी 
                 झाली नाही माझी ती 

सोडून जातांना एकदा


सोडून जातांना एकदा 
तू मागे वळायचं होतं.....
तुझं माझं नातं 
थोडं जपायचं होतं.....

पाठ फिरवली मी, 
तु हाक मारायचं होतं....
लपवलेल्या अश्रुंना माझ्या 
थोडं न्याहाळायचं होतं.....

काय हरवलं आहे आपल्यात ?
एकदा विचारायचं होतं....
अबोला धरला मी, 
तु कारण ताडायचं होतं. ...

हसतांना मला बघुन ,
तु जरा गोंधळायचं होतं
एक हुंदका मी जपला,
तु ओळखायचं होतं....

स्वार्था पुरतीचं प्रेम माझं,
हे ही खरंच होतं....
पण स्वार्थातल्या या प्रेमात 
एक "प्रेम" तेवढंच मुद्याचं होतं....

मार्ग आपले वेगळे, हे तर
शेवटी होणारच होतं...
स्वीकारायचं कसं.... हेच फक्त
कळत नव्हतं...

काळीज मी आणि ठोका तु एवढच
मला म्हणायचं होतं....
तुझं माझं नशीब, त्याने असच
का लीहायचं होतं.... ?????

ती दिसली.....


ती दिसली.....
भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरले
तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रु बरसले.....

तिचीच आस धरून, आयुष्यात मी बिखरलो
नसताना ती जवळ, जगनेही मी विसरलो.....

तिचीच वाट पाहत, पापण्या माझ्या पाणवल्या
सावल्या डोळ्यातून ह्या, आभाळा सारख्या बरसल्या.....

खुप काही म्हणायच होता, शब्द माझे आतुरलेले
मुखातून न उमलता, डोळ्यातून उमललेले.....

म्हंटल ज़रा जवळ जाऊन, तिच्याशी थोड बोलाव
तिच्या आठवणीसंगे जगतो, तिलाही थोड कळाव.....

तिच्या आठवणीची ओंजंळ, तशीच भरून ठेवलेली
एकही क्षण न सांडवता, जिवापाड मी जपलेली.....

कंठ आज दाटून आला, तिला समोर पाहून
बरच काही बोलायच होत, मनात गेले शब्द राहून.....

इतक्यात तिने पाहिले मला, डोळ्यात अश्रु ढाळत
अनेक प्रश्नांची उत्तर मिळाली, मलाही न कळत.....

नव्हती ती आज माझी, झाली दुसर्या कोणाची
रेशम गाठी तुटल्या आमच्या, तरी सदैव राहिली ती या वेड्या मनाची.....

२० डिसेंबर, २०१४

कळेल का रे कधी

देवा तिला माझं प्रेम, 
कळेल का रे कधी ??? 
देवा तिला माझे मन, 
समजेल का रे कधी ??? 
देवा तिला माझी तडफड, 
जाणवेल का रे कधी ??
देवा ती ही माझ्यावर प्रेम, 
करेल का रे कधी ??? 
देवा तिला माझे वाहणारे अश्रूं, 
दिसतील का रे कधी ??? 
देवा तिला माझ्या भावना, 
उमजेल का रे कधी ???
देवा तिला माझी वेदना, 
होईल का रे कधी ??? 
देवा ती ही माझे दुःख, 
सोसेल का रे कधी ??? 
देवा ती ही माझं प्रेम,
स्विकारेल का रे कधी ??? 
जर.....!!! असे काहीच नाही झाले, 
जर तु तिला माझे नाही केले..... तर.....!!!
माझं स्वतःच अस्थित्व मिटवून,
तुझ्याकडे मागेल मी मरण ती दुरावण्या आधी.....
तुझ्याकडे मागेल मी मरण ती दुरावण्या आधी.....

तूच का आठवलीस..

तूच का आठवलीस...
वेड्या सारख रात्र भर जागलो..
आणि स्वतः
च्या मानासोबत उनाड वागलो..
कोण जाने कसकाय..
अचानक तू आठवलीस.
शाळे मध्ये सोबत असतानाची..
तीतूझी आठवण तू हळूच मनात पाठवलीस..तुझ गोड हसन....
त्यावरतुला आम्ही चिडवण..
मग तुझी ती जर्मन ची पेटी..आणि माझ कातड्याच दप्तर ..किती गम्मत होती..
त्या दिवसांची..पण तेन्व्हाच ते छोटस मनकस प्रेमात पडणार....!!आणि त्या बिचाऱ्याला पण काय कळणार..पण आज अचानक तू आठवलीस..आणि माझी ओठ्वर एक प्रेमच हास्य पाठवलीस..आज तू कुठे आहेस हे पण माहित न्हाय..आणि शोधाव तस तुझ पूर्ण नाव पण आठवत न्हाय.किती गम्मत असते न ह्या मनाची..अचानक वेड्या वाणी जुन्या आठवणी कुरतडत..आणि मग शोधण्य साठी धडपड करत असत.....पण मला हेच कलाल नाही कि फक्त तूच का आठवलीस..फक्त तूच का आठवलीस..

हवाई सुंदरी

एक हवाई सुंदरी होती,
ती दिसायला तर सुंदर होतीच
पण त्यापेक्षाही सुंदर
तिची आपल्या नवर्यावर प्रेम
करण्याची पद्धत
होती .............. जेव्हा जेव्हा ती बाहेरच्या देशात
असे तेव्हा तेव्हा ती रोज एक
गुलाबाचे फुल
आपल्या नवर्याला पाठवत असे,
आणि जाणवून देत असे
कि मी कुठेही असले तरी मनाने मी फक्त तुझ्या जवळच
आहे ....................
ती दुसरीकडे
असताना तिच्या रोज
येणार्या गुलाबाच्या फुलाची तिच्या नवर्याला आता सुखद
सवय झाली होती ........... पण, कदाचित त्या हवाई सुंदरीचे हे
सुंदर प्रेम देवालाही आवडले
असावे म्हणून कि काय पण देवाने
तिला आपल्याकडे बोलावून
घेतले, तिच्या विमानास
अपघात झाला आणि बिचारी आपले
प्राण गमावून
बसली .....................
हि बातमी ऐकून
तिचा नवरा एवढा रडला कि उभ्या आयुष्यात
तो कधी एवढा रडला नसेल किंवा त्याच्या इतके
कोणी एवढे रडले नसेल ..................
पण इथे तिचे प्रेम संपले नव्हते, ते
तर आता सुरु झाले होते,
तिच्या दुर्दैवी मृत्युनंतर देखील
रोज त्याला गुलाबाचे फुल मिळत होते...............
हे बघून तिचा नवरा आश्चर्य
चकित झाला व ह्या मागाचे
कारण शोधण्यासाठी त्याने
रोज फुल घेऊन येणार्या मुलास
विचारले तिचा नवरा :- तुला हे फुल कोण
देत नक्की, माझी बायको मरून
१५ दिवस झाले तरी तू रोज फुल
आणून देत आहेस, नक्की प्रकार
काय आहे ?
मुलगा :- साहेब, तुमची बायको तुमच्यावर खूप
प्रेम करते,
तिची विचारशक्ती खूप
पुढची होती, म्हणून तिने आधीच
विचार करून ठेवला होता कि,
"जर कधी विमानास अपघात झाला तर माझे जीवन संपेल पण
प्रेमाला कधी संपवायचे नाही"
आणि ह्या विचाराने तिने
मला आधीच भरपूर पैसे देऊन ठेवले
आहेत जेणे करून आयुष्यभर
ती आता तुम्हाला रोज एक गुलाबाचे फुल देऊ शकेल ....
आणि तिचे नसणे
सुद्धा तुम्हाला असण्याची जाणीव
करून देईल.

१९ डिसेंबर, २०१४

♥♥तुझ्यावर प्रेम करण्यासाठी♥♥

तुझ्याकड़े पहाण्याचा तो पहिला क्षण
आज मला खुप आठवतो..
तुझ्यासाठी वेडा होणारा तो माझा मन
मला खुप हसवतो..
तुझ ते माझ्या कड़े पाहण
हळूच काहीतरी इशारे करण
माझ्याकड़े बघून हसण..
अचानक नजर फिरवून लाजन
अस वाटत क्षणभर थांबाव तुझ्यासाठी..
तुझ्या त्या प्रेमळ सोबतीसाठी.
तुझ्या सोबत जीवन जगण्यासाठी..
♥♥तुझ्यावर प्रेम करण्यासाठी♥♥

१७ डिसेंबर, २०१४

मरण

मरण जरी आलं तरी 
ते ऐटीत असावं फक्त 
इच्छा एकच मी 
तुझ्या मिठीत असावं

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...