आपण उगीच कुणाचीही आठवण
काढत बसत नाही,
आठवण त्याचीच येते,
ज्याचे मनाशी असलेले बंध
कधीच तुटत नाहीत..
आणि
अशी आठवण आल्यावर
आपण कितीही सावरलं तरी,
आपले डोळे मात्र हळूच
पाणावल्या शिवाय
राहतही नाहीत.!!
माझ्या मनातलं तुला सांगायचा खूप प्रयत्न केला, पण तू कधी ते समजून घेतलं नाही... खूप दु:ख आहे माझ्या हसण्यामागे, पण खरंच ते तुला कधी दिसलं नाही... दिसला तो फक्त माझा राग, स्वभाव, पण माझं प्रेम तू कधी जाणलंच नाही...
तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा