ad

२३ डिसेंबर, २०१३

एक प्रेम कहाणी .....



मुलगा आणि मुलगी बागेत बसलेले असतात, . मुलगा :- मला वाटते आता आपण दोघेचं ह्या जगामध्ये राहिलो आहोत ..... कारण माझे सारे मित्र प्रेमात आहेत ...!! . मुलगी :- मलाही हेचं वाटते कारण माझ्याही सा-या मैत्रिणी प्रेमात आहेत ..... . मुलगा :- आता काय करायचे ? . मुलगी :- आपण एक खेळ खेळूया ..... . मुलगा :- खेळ ... कोणता खेळ ? . मुलगी :- ३० दिवसांसाठी आपण एकमेकांचे गर्लफ्रेंन्ड, बॉयफ्रेंन्ड बनुयात ..... . पहिले १ ते ५ दिवस :- ते सिनेमा पाहतात, भरपूर फिरतात ..... . ६ ते १५ दिवस :- सर्कस मध्ये असलेल्या भूत हवेली मध्ये ते जातात, ती खूप घाबरते आणि त्याचा हात पकडते पण नंतर लक्षात येते कि तिने चुकून दुस-याचाचं हात पकडला आहे ..... . दोघेही हसतात, बाहेरचं एक ज्योतिषी बसलेला असतो ते आपले भविष्य त्याला विचारतात, तो म्हणतो तुम्ही लवकरात लवकर लग्न करून घ्या, आणि आनंदात रहा ..... आणि तो ज्योतिषी रडायला लागतो ..... . १६ ते २८ दिवस :- ते दोघे एका टेकडीवर बसले असता चांदणी पडताना त्याना दिसते ..... ती मुलगी काहीतरी पुटपुटते ..... . २९ वा दिवस :- पुन्हा ते दोघे त्याचं बागेत त्याचं जागेवर येऊन बसतात ..... . मुलगा :- मी तुझा अँपल ज्यूस घेऊन येतो असे म्हणून तो तेथून जातो, २० मिनिट नंतर एक अनोळखी माणूस तेथे येतो :- तो मुलगा तुम्हाचा बॉयफ्रेंन्ड आहे का ? . मुलगी :- हो, का ? काय झाले ? . अनोळखी माणूस :- त्याला एका गाडीने उडविले आहे व तो खूप गंभीर अवस्थेत आहे ..... . हरणीच्या गतीने ती अतिशय दुःखी होऊन त्याला भेटण्यासाठी तेथून पळ काढते ..... . २९ वा दिवस रात्री ११ वाजून ५७ मिनिटांनी :- डॉक्टर बाहेर येतात व त्या मुलीच्या हातात अँपल ज्यूस व पत्र देतात ..... . ती ते पत्र वाचते :- हे २९ दिवस जे मी तुझ्या बरोबर घालविले ते माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते ..... मी तुझ्या प्रेमात पडलो आहे, आणि हा खेळ आपण आयुष्यभर खेळावा हि माझी ईच्छा होती ..... . मुलगी आक्रोश करून रडू लागते :- नाही, मी तुला मरून देणार नाही ..... चांदणी पडल्यावर मी तुलाचं मागितले होते, मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते ..... आता मला कळाले कि तो ज्योतिषी का रडला होता, पण मी तुला मरून देणार नाही ..... प्लीज मला सोडून नको जाऊस प्लीज ..... .. Love You, I Love You, I Love you very very much !! . तेवढ्यात रात्रीचे १२ वाजतात ..... मुलाचे हृदय पुन्हा श्वास घ्यायला लागते ..... . तो ३० वा दिवस होता ..... . कोणीतरी खरचं म्हंटल आहे कि" अगर किसी चीज को तुम सच्चे दिल से चाहो, तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने में जूट जाती हैं ....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.....।।'s Post

तुझ्याबद्दलच्या भावनांनी व्यक्त कसे व्हावे तुझ्यावरती लिहीताना शब्दही अपुरे पडावे तु समोर येताच वाटे मनातील सारे बोलावे तुला गमावण्याच...